Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर शिवसेनेची बाजी, भाजपला फटका

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर शिवसेनेची बाजी, भाजपला फटका


राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election Results 2022) काल, रविवारी मतदान झालं. आज या शेकडो गावांचे गाव कारभारी त्या त्या गावाला मिळणार आहेत. राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे.  पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार  आहे. दुपारपर्यंत सर्व जागांवरील चित्र स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.


अकोला जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी पार पडली. या निवडणूक निकालात शिवसेनेने बाजी मारत दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या बाळापूर तालूक्यातील व्याळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाय. व्याळाच्या सरपंचपदी शिवसेनेच्या गजानन वजीरेंनी 1529 मतं घेत तब्बल 600 मतांनी विजय नोंदवलाय. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची होती. अकोट तालुक्यातील आदिवासी भागातील सात ग्रामपंचायतींचे निकालही संमिश्र आहेत. अकोट तालुक्यात सर्वाधिक तीन ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाड्या आणि अपक्षांनी बाजी मारलीये. तर प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीनं बाजी मारलीये. अकोटमधील अमोना ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झालीये. तर सोमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी कुणीच अर्ज दाखल न केल्याने ते पद रिक्त आहेय. 13 सदस्य असलेल्या व्याळा ग्रामपंचायतीवर शिवसंग्रामचे तब्बल पाच सदस्य निवडून आलेयेत. अकोट तालूक्यातील निवडणुकीत भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना मोठा झटका बसलाय. 



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या