राजुरा घाटे येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली
संतोष माने, प्रतिनिधी:-
मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम राजुरा घाटे येथील तुळशीराम वामनराव शिंदे या शेतकर्याने आपल्या शेत शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 25 जून 2022 रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली.
सदर घटनेची माहिती त्यांची पत्नी आपल्या शेतात गेली असता आपला पती गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले.तसेच मृतकाच्या पत्नीने आरडाओरड सुरू केल्याने गावातील लोक जमा झाले व गावचे पोलीस पाटलांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली.ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोविंदराव पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद राठोड , जावेद खान यांनी घटनास्थळी पंचनामा करून सदर घटनेसंदर्भात मर्म दाखल केल्या गेला. व मृतकास पोस्टमार्टम करण्यासाठी श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात मुर्तीजापुरला पाठविण्यात आले. _____________________________________ .
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या