Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसी स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभरात ७५ हजार अमृत सरोवरं तयार करण्याचा केला संकल्प

वाढदिवसी स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभरात ७५ हजार अमृत सरोवरं तयार करण्याचा केला संकल्प 

वाढदिवसाच्या दिवशी ७५ हजारांचा उल्लेख करत गडकरींनी केला संकल्प



देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं नितीन गडकरी संकल्प, ऑफिसमध्ये एक संस्कृतमधलं पद्मश्री डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांच्या गाण्यातलं एक वाक्य लिहिलं आहे. मनसा सततं स्मरणीयम्. मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयम्… असं ते वाक्य आहे,” असं गडकरी म्हणले. 


पुढे बोलताना त्यांना आपला संकल्प सांगतात, “उद्या मी अकोल्याला जात आहे. तिथे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत. त्यापैकी २० सरोवरांचं उद्या उद्घाटन आहे. मी या वर्षी संकल्प करतो की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्फत वर्षभरात ७५ हजार अमृत सरोवरं तयार करणार आणि पंतप्रधानांच्या या मोहिमेमध्ये मदत करणार त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करु,” असंही गडकरींनी सांगितले. तसेच पुढे बोलताना, “मी मानतो की राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक विकासाचं साधन आहे. जे शोषित आहेत, पीडित आहेत, दलित आहेत, सामाजिक आर्थिक आणि शैक्षिणक विकासापासून जे दूर आहेत (त्यांच्यासाठी काम करायचं) हा जो पंडित दिनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार आहे त्यासाठीच मी स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून जेवढं काम करता येईल तेवढं केलं पाहिजे. ते प्रयत्न मी सतत करत राहील,” असं गडकरी म्हणाले. आज नितीन गडकरींना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसत आहे. अनेकजण रांगेत उभं राहून गडकरींना भेटायला येत आहे. गडकरींच्या घराबाहेर शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने एक मंडप उभारण्यात आले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या