माती परीक्षणानुसार पिक निवड महत्वाची - अँड गजानन पुंडकर
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर - डॉ. विजय काळे
श्रीधर पर्वात कृषक मेळाव्याचे आयोजन
अकोला दि. २५ एप्रिल - निंबा परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकास आणि विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याने कर्मयोगी ठरलेल्या स्व. श्रीधराव देशमुख उपाख्य ‘मालक’ यांचा जन्म शताब्दी महोत्सवात नियोजित कार्यक्रमातील कृषक मेळावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या सहकार्याने दि. २५ एप्रिल रोजी श्री शिवाजी विद्यालय, निंबा येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर तर प्रमुख अतिथी निंबा गावचे पोलीस पाटील श्री प्रमोद देशमुख, प्रा. गजानन भारसाकळे, डॉ. मंदार देशमुख उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. विजय काळे व डॉ. उज्ज्वल राऊत होते. मेळाव्याचे प्रास्ताविक प्राचार्य विजय ठोकळ यांनी केले तसेच आपल्या ओजस्वी मनोगतातून दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष व श्रीधरपर्व वार्षिक महोत्सवाचे आयोजन समिती सदस्य प्रा. गजानन भारसाकळे यांनी निंबा परिसरातील शेतकरी व त्याकाळी त्यांच्या जीवन उत्कर्षासाठी श्रीधर बाप्पू यांच्या अथक परीश्रमातून पार पडलेले कार्य यावर प्रकाश टाकला.
भाजीपाला उत्पादन वाढीच्या दृष्टीने मृदा व जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण, हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञान तसेच दैनंदिन आहारात भाजीपाल्याचे महत्व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील भाजीपाला भाजीपाला शास्त्र विभागातील डॉ. विजय काळे यांनी निंबा परिसरातील वर्गाला सांगितले. फळ शास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यपक डॉ. उज्ज्वल राऊत यांनी ग्रामीण तरुण कृषी उद्योजकतेसह व्यावसायिक कौशल्य समजून घेत कृतियुक्त प्रशिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरु ठेवण्याचे आवाहन केले तसेच कृषी प्रशिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील याची विद्यापीठाच्या वतीने ग्वाही दिली. शेतकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बाली न पडत जमीन, हवामान व बाजारपेठचा अभ्यास करून फळ पिकांची निवड करावी असे प्रतिपादन केले. संत्रा, निंबू, केळी, चिकू, पपई, आंबा, पेरू, सीताफळ, आवळा लागवडीसाठी मार्गदर्शन केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून माती परीक्षणाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री अनिल बढे तर आभार प्रदर्शन श्री नितीन पाटील यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वतीतेसाठी श्री प्रमोद तरटे व प्रसंजीत देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी वर्ग व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या