४६३ केंद्रांवर दहावीची परीक्षा ! कुठेही अनुचित प्रकार नाही
केंद्र परिसरात चोख बंदोबस्त विभागात चार टक्के विद्यार्थ्यांची अनुपस्थिती
दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ता. १५ मार्च पासून सुरू झाली असून शाळा तिथे केंद्र असल्याने ४६३ केंद्रावर मंगळवारी परीक्षा पार पडली. विभागात जवळपास लाख ६० हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून जिल्ह्यातील २५ हजार ९९५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. मंगळवारी झालेल्या मराठीच्या पेपरला विभागात चार टक्के विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती.
बारावी पाठोपाठ दहावीची परक्षाही (ता. १५) मार्च पासून सुरू झाली आहे. ही परिक्षा चार एपिलपर्यंत राहणार आहे. जिल्ह्यातील ४६३ केंद्रांवर २५ हजार ९९५ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. तर पुर्नपरिक्षार्थी म्हणून ६९४ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. परीक्षेदम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. परिक्षा केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी वाजेपर्यंत शंभर मिटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश कलम १४४ लागू कण्यात आले आहे. कोविड नियमांचे पालन करुन परीक्षा होणार असल्याने बोलताना दिली. विद्यार्थ्यांची तापमान मोजणी, हाताचे निर्जंतुकीकरण, मास्कची पाहणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रनिहाय नियोजन केले असून, केंद्रांवर केंद्र प्रमुख, पर्ववेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या