*कृषीपंपांचे विज कनेक्शन कापण्याची मोहीम त्वरीत थांबवा अन्यथा आंदोलन छेडू – आ. रणधीर सावरकर*
*विधानसभेत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाला महावितरणने फासला हरताळ*
अकोला
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने शेतक-यांच्या कृषीपंपांचे विज कनेक्शन कापणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या सार्वभौम व पवित्र सभागृहात दिली. मात्र महावितरण तर्फे राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला जात आहे. जिल्हयात शेतक-यांच्या कृषी पंपांचे विज कनेक्शन कापल्याच्या तक्रारी शेतक-यांकडून प्राप्त झाले आहे. हा विधानसभेच्या पवित्र सभागृहाचा अवमान आहे. शासनाने त्वरीत महावितरणला कृषीपंपांचे विज कनेक्शन न कापण्याबाबत निर्देश द्यावे, अन्यथा आम्ही शेतक-यांसह आंदोलन छेडू असा ईशारा आमदार रणधीर सावरकर . यांनी दिला आहे.
राज्यात नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आर्थीक विवंचना व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा परिस्थीतीत शेतक-याला मदतीचा हात देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या संदर्भात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली थकित विजबिलापोटी शेतक-यांच्या कृषीपंपांचे विज कनेक्शन कापणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आले. मात्र राज्य सरकारने विधानसभेच्या पवित्र व्यासपिठावर दिलेल्या या आश्वासनाला महावितरणने हरताळ फासला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. शेतक-यांच्या व्यथा, वेदनांशी राज्य सरकारला काहीही देणेघेणे नाही हे यावरून स्पष्ट होते. सरकारने तातडीने कृषीपंपांचे विज कनेक्शन कापण्याची ही मोहीम त्वरीत थांबवावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा आ. रणधीर सावरकर यांनी दिला आहे.
अकोला
अकोला जिल्हा भाजपा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी मुंबईत घोषणा झाल्याबरोबर ताबडतोब राज्य शासनाने मुंबई आणि नवी मुंबई यांच्या संदर्भात पाचशे स्क्वेअर मालमत्ता करावर कर माफी घोषणा केली त्याच धर्तीवर अकोला सह विदर्भातील सर्व महानगरपालिकेला कर्जमाफीची घोषणा करावी व होणारा नुकसान राज्य शासनाने द्यावा अशी जी मागणी केली त्यानंतर काँग्रेस शिवसेना यांना जाग आला त्यांनी नवी मुंबई आणि मुंबईला देण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच धर्तीवर अकोल्यात करण्यासाठी आपल्या राजकीय वजन व आपल्या नेत्यांवर दबाव आणून अकोलेकरांना एक हजार स्केअर फुट पर्यंत मालमत्ता कर माफ करण्याचा व होणारे नुकसान अनुदान स्वरूपात महानगरपालिका देण्यासाठी पाठपुरावा करावा भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील केवळ स्टंटबाजी करण्याऐवजी प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे प्रयत्न करावे असे आव्हान विनंती भाजपा प्रसिद्धीप्रमुख नगरसेवक गिरीश जोशी यांनी केली आहे. व अकोलेकरांना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी शिवसेना काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घ्यावा.
0 टिप्पण्या