समुद्रे यांच्या घरापासून ते सुरेशजी मकोरिया यांच्या घरापर्यंत रस्ताचे भूमिपूजन
आज दिनांक.३०/१२/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता मा.श्री आमदार गोवर्धनजी शर्मा (लालाजी) यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक २ मधील आपातापा रोड बापू नगर भागातील मिठूलालजी समुद्रे यांच्या घरापासून ते सुरेशजी मकोरिया यांच्या घरापर्यंत रस्ताचे भूमिपूजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून खा.मा. श्री संजयजी धोत्रे,आ.मा.श्री गोवर्धनजी शर्मा, जिल्हाध्यक्ष आ.मा.श्री रणधीर भाऊ सावरकर आ.मा.श्री वसंतजी खंडेलवाल,भाजपा शहराध्यक्ष मा.श्री विजय भाऊ अग्रवाल,महापौर सौ.अर्चनाताई जयंत मसने,उपमहापौर मा.श्री राजेंद्रजी गिरी,सभापति मा.श्री संजयजी बड़ोणे,सरचिटणीस अक्षयजी गंगाखेडकर,नगरसेविका सौ. अनिताताई राजेश चौधरी, नगरसेविका सौ.आरतीताई प्रकाश घोघलिया,यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी,जयंतभाऊ मसने, राजेशजी चौधरी,रमेशजी करीयार,कल्लूजी अहिरवाल सुरेशजी जाधव,राजेशजी रेड्डी,प्रकाशजी घोघलिया, कैलासजी रणपिसे,उज्वलजी बामनेट,टोनी जयराज,अविनाश जाधव,नितीन राऊत,रंजनाताई पवार,व पदाधिकारी कार्यकर्ते मोठे संख्याने उपस्थित होते तसेच सुदर्शन समाजाचे वरिष्ठ कार्यकर्ते.श्री ननकुजी शुक्रवारे,नारायणजी मकोरिया,सुभाषजी धमेरिया, मनोजजी लुडेरे,राजूजी महातो, करणजी मेसरे,उज्वल मेसरे, व युवा कार्यकर्ते, मातृशक्ती तसेच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.व आ.मा.श्री गोवर्धनजी शर्मा (लालाजी) यांचे सुदर्शन समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले व त्यांचे आभार व धन्यवाद समाजानी व्यक्त केले.🙏🏻💐
गारपीट भागात सर्वे करून खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात निवासी जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन
अकोला
घोषणा करून सुद्धा कृषी , महसूल, पिक विमा कंपनीने तसेच अतिवृष्टी, गारपीट भागात सर्वे करण्याचं काम सुरू केलं नाही ते शीघ्रगतीने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच बी बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी आग्रहाची मागणी जिल्हा भाजपा तर्फे माजी केंद्रीय राज्य मंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात निवासी जिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या मुद्द्यावर शासनाकडे व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या मांडण्याचे काम करीत असते. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच अकोला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये सुरू करण्यात आली नाही. दोन जून रोजी तीनशे बेड हॉस्पिटल सुरू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. क्रीडा संस्कृती भवन चे अर्धवट काम आहे तहसील कार्यालयाचे अर्धवट काम आहे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे थांबली आहे. वारी वारी अकोट तेलारा या मार्गातील रस्ते ची कामे थांबली आहे.अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले नाही या सर्व विषयावर आज भाजपाने निवेदन देऊन राज्य शासनाने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी केली जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात माधव मानकर, अंबादास धुमाळे महापौर अर्चनाताई मसने, गोपाल चव्हाण गणेश आधारे अतुल आवारे शैलेंद्र हागवणे प्रवीण हगवणे पाटील,हिम्मत देशमुख अभिमन्यू नळकांडे सुमन पाटील नारायण लांडे नीलेश नीनोरे हरिष अमानकरउमेश गावंडे ऋषिकेश पाटील नंदकिशोर आगवणे गोपाल चव्हाण बाळू चांदुरकर विनोद पोपट घाट अतुल आवारे शैलेश अगवाने अनिल गावंडे विजय पुंड सागर तायडे जयंत मसने, एडवोकेट देवाशीष काकड, अतुल अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते
आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ
मुंबई, ३० डिसेंबर २०२१
आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा गौप्यस्फोट
राज्यातील सत्ताधारी आघाडीतील घटकपक्षांमध्ये आघाडीतून आधी कोणी बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ सुरू झाली आहे. पण गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास ध्यानात घेता, पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही घटक पक्षासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.ते म्हणाले की, राज्यात गेले दोन दिवस जे घडत आहे ते आघाडीतील घटकपक्षांमध्ये बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी चालू झालेल्या चढाओढीचा परिणाम आहे. तथापि, गेल्या २६ महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा, त्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा आणि भाजपा आमदारांना विकासासाठी निधी नाकारण्याचा इतिहास आहे. तो पाहता यांच्यापैकी कोणासोबत जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. अर्थात याविषयीचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत येण्याची ऑफर दिली होती, या शरद पवार यांच्या दाव्याविषयी एका पत्रकाराने विचारले असता मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मा. मोदीजींनी ऑफर दिली होती हे सांगायला शरद पवार यांना इतका वेळ का लागला, हा प्रश्न आहे. अशी ऑफर मिळाली असती तर ती नाकारण्याइतका राजकीय असमंजसपणा पवारांचा नाही. पण त्यांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही.त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारकडून भाजपा कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणे व त्यांना अडकविण्याचा प्रयत्न चालू आहे. केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आघाडी सरकारचे तोंड फुटले. आता दादागिरी करून आ. नितेश राणेंच्या बाबतीत दुसरा प्रयत्न चालू आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. राणे त्यांना पुरुन उरतील.भाजपा आणि शिवसेनेत अंतर वाढविण्याच्या कामाची शरद पवारांनी जाहीर कबुली दिली आहे. त्यानंतरही शिवसेनेला पवारांबद्दल प्रेम असेल तर ते त्यांना लखलाभ होवो, असा टोला त्यांनी हाणला.ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा विधिमंडळात ठराव झाला असला तरी त्यामागे सरकारची ओबीसी आरक्षणापेक्षा स्वतःच्या नेतृत्वाची काळजी आहे. लगेच निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते प्रचारासाठी उपलब्ध असणार नाहीत. एकमेव नेता उपलब्ध होणार नसेल तर निवडणुका पुढे ढकला याला अधिक महत्त्व देऊन ठराव झाला. तथापि, राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करण्याची भूमिका पाहता या ठरावाचा किती परिणाम होईल याची शंका आहे.
त्यांनी सांगितले की, विधिमंडळाच्या पाच दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशात सामान्य लोकांच्या हिताचे एकही काम सरकारने केले नाही. केवळ ३२००० कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेणे आणि घाईघाईत १९ विधेयके मंजूर करून घेणे हे काम या सरकारने केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला विधानसभा अध्यक्ष निवडणूक नकोच होती त्यामुळे त्यांनी प्रयत्न केल्याचा फार्स केला.
( मुकुंद कुलकर्णी)
कार्यालय सचिव
0 टिप्पण्या