Ticker

6/recent/ticker-posts

तमाम बहुजन जनतेने बळीराजाला न्याय देण्यासाठी वामन दहनाचे कार्यक्रम आयोजित करावेत --महादेवराव भुईभार


तमाम बहुजन जनतेने बळीराजाला न्याय देण्यासाठी वामन दहनाचे कार्यक्रम आयोजित करावेत --महादेवराव भुईभार 


स्वराज्यद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी वध दिन साजरा.


अकोला -- भारतीय रक्षक आघाडीचे वतीने दि.10 नोव्हेंबर 2021 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता अशोक वाटीका अकोला येथे स्वराज्यद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी वध दिवस साजरा करण्यात आला. प्रतापगड जिल्हा सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर  दि. 10 नोव्हेंबर 1669 ला  तलवारीने वार केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी  स्वराज्यद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी  याचा  वध केला, हे सर्वसामान्य जनतेमध्ये माहिती व्हावी यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ समाज सेवक महादेवराव भुईभार हे होते, त्यांनी अध्यक्षस्थानावरून  बोलतांना आवाहन केले की,बहुजनांचा महापराक्रमी  बळीराजाला वामनाने (मनुवादी ब्राम्हणाने ) कपट नितीने संपवुन बळीचे राज्य संपविले,म्हणून यापुढे तमाम बहुजन जनतेने बळीराजाला न्याय देण्यासाठी वामन दहनाचे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहेत असे मत महादेवराव भुईभार यांनी व्यक्त केले. 
कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार हरिदास  भदे , डॉ. एम. ए. कुददुस, डॉ.धनंजय नालट, बी.एस. इंगळे,  भीमशाहिर देवानंद गवई, भाऊराव वानखडे, करुणा सिरसाट, रत्नाबाई गजभिये, हे होते, तर विशेष पाहुणे भदंत विशालकीर्ती, भदंत अश्वजित उपस्थित होते, यावेळी सुमधुर आवाजात देवानंद गवई व मंगला गवई यांनी स्वागत गीताचे गायन केले. उपस्थित मान्यवरांनी आपले मोलाचे मनोगत व्यक्त केले . 


      यावेळी कार्यक्रमाला  प्रामुख्याने विश्वनाथ उरखडे, नाशिकराव परघरमोर, शुद्धोधन तायडे, शेषराव सिरसाट, संजय लांजेवार, निखाडे साहेब , मनवर सर, तेजराव तायडे,, पिंगलाबाई उरखडे, रत्नाबाई गजभिये, नंदाबाई सिरसाट, यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघपाल सिरसाट यांनी केले तर सूत्रसंचालन कॅप्टन विजय वाहुरवाघ यांनी केले , आभारप्रदर्शन अमोल भालेकर यांनी केले,
 संपादक प्रा.पी.एस.थोरात,  जााहिरा बातमी साठी संपर्क 9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या