Ticker

6/recent/ticker-posts

अकोट तहसील कार्यालय पुरवठा विभागात वसुली साठी ठेवलेल्या खाजगी दलालांवर तातडीने कार्यवाही करावी

अकोट तहसील कार्यालय पुरवठा विभागात वसुली साठी ठेवलेल्या खाजगी दलालांवर तातडीने कार्यवाही करावी



*अकोट तहसील कार्यालय पुरवठा विभागात वसुली साठी ठेवलेल्या खाजगी दलालांवर तातडीने कार्यवाही करण्यासोबतच सामान्य नागरिकांना वेठीस न धरता त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने सामाजिक संवेदना जपण्याचे भान ठेवावे अशा सूचना भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार  रणधीर सावरकर यांनी केल्या.*
    *सरकारी योजनांसंदर्भात सरकारी अधिकारी यांनी सर्वसामान्यांशी सौजन्याने वागून वंचित पीडित गरजूंना योग्य मार्गदर्शन करून सहकार्य केल्यास प्रशासनाविषयी आपुलकी निर्माण होते, पद हे न्याय देण्यासाठी असते यासाठी अकोट तहसील कार्यालय पँटर्न महाराष्ट्रभर म्हणून लोकप्रिय होण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कार्य करावे तसेच शेतकरी यांना अतिवृष्टीमदत, वेळेत पंचनामे,श्रावणबाळ निराधार सेवा योजना संदर्भात शिघ्र निर्णय घ्या अशाही सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केल्या.*


जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप पिक आणि खरडून गेलेल्या जमिनीचे अपूर्ण पंचनामे तसेच शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेला मोबदला, पंचनाम्याअभावी  रखडलेला विमा मोबदला, तसेच ग्रामीण भागातील इतरही ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी आ. रणधीर सावरकर यांनी उप विभागीय अधिकारी, अकोट याचे कक्षात स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व समस्या ग्रस्त नागरिक यांचे समवेत बैठक घेतली. अतिवृष्टी व पुरामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदी काठावरील जमिनी खरडून गेल्या परंतु  शासनाकडून नुकसानी बाबतचे पंचनामे अद्याप पर्यंत सुद्धा पूर्ण  न  झाल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळाली नाही. किनखेडपूर्णा, केळिवेळी इत्यादी पूर्णा नदीच्या काठावरील गावातील पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असता सर्वेक्षण केल्या गेल्या नसल्याचे सकृत दर्शनी दिसून आले.  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आ. रणधीर सावरकर यांनी केल्या. तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनांचा मोबदला अद्यापही वितरीत केल्या गेला नसून तो तातडीने निराधार लोकांना वाटप करण्यात यावा. उपस्थित असलेल्या नागरिकांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड वितरीत न करणे, राशन कार्डावरील नावांमध्ये बदल करणे आशा कामांसाठी कर्मचारी गोर गरीब गरजूंची अडवणूक करून पैशाची मागणी करतात. २०० रुपयामध्ये नाव बदलून देणे, २००० रुपयामध्ये रेशनकार्ड घरपोच पोहोचविणे, आर.सी. नंबर साठी पैशाची मागणी करणे असे अफलातून तक्रारी नागरिकांनी केल्या असता पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे समक्ष झाडा झडती घेऊन त्यांचेवर तातडीने योग्य कार्यवाही करावी असे आदेश आ. रणधीर सावरकर यांनी दिले असता सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी तहसीलदार यांनी खाजगी दलालांवर कार्यवाही करण्यासाठी प्रसंगी पोलीस प्रशासनाकडे दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी तक्रार नोंदवावी. परिस्थितीचे गांभीर्य राखत तहसीलदार अकोट यांनी अकोट येथील ठाणेदार अहिर यांना पाचारण करण्यात येऊन त्या संबंधी लेखी तक्रार देण्याचे आश्वस्त केले. मागील दोन वर्षांपासून कोरोनां महामारीमुळे अस्ताव्यस्त झालेले जीवन पूर्वपदावर येत असताना सामान्य नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही झळ पोहोचू नये व त्यांची कामे तातडीने करण्यात यावीत. सदर बैठकीत उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या आ. रणधीर सावरकर यांचे उपस्थित क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे समोर मांडल्या असता अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने समस्या मार्गी लावण्यात येतील या बाबत नागरिकांना खात्री दिली. सदर बैठकीला  उप विभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार मडके, तालुका कृषी अधिकारी शिंदे, विस्तार अधिकारी थूल, महावितरण कार्यकारी अभियंता उईके, उप अभियंता अग्रवाल, उप विभागीय अभियंता संजय बोचे, राजूभाऊ नागमते, अशोकराव गावंडे, राजेश रावणकर, मधुभाऊ पाटकर, संतोष शिवरकर, किशोर बुले, उमेश पवार, प्रवीण डीक्कर, विठ्ठल वाकोडे, गोपाल पेठे, विजय साळुंके, दत्तू पाटील गावंडे, अनिल इंगळे, नितीन पाटील, किशोर सरोदे, विवेक भरणे, मोहन सावरकर, गोपाल मोहोड, विलास बोडखे, कनक कोटक, राध्येश्याम यावलकर, हरिभाऊ आवारे, मंगेश ताडे, प्रकाश आतकर, विष्णू येउल, राजेंद्र मावलकर आदी उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या