मुंबई : कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील लॉकडाउन निर्भंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे.1ऑगष्ट पासून राज्यातील निर्भंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहमती झाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय घेणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. या वेळी त्यांनी दोन दिवसांत लोकल सबंधी निर्णय घेऊ शकतो असंही म्हटलं आहे. राज्यात लागू असलेल्या निर्भंधामध्ये शिथील ता देण्याचा निर्णय झाला आहे. त्या संदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. आता फक्त अहवालावर मुख्यमंत्र्याची सही होणं बाकी आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे हयांनी प्रसारमाध्यमांना दिली.
0 टिप्पण्या