Ticker

6/recent/ticker-posts

उपराजधानी नागपूर आणि अकोला वाशिम अमरावती यवतमाळ मधून रात्रीची बससेवा सुरु करा

उपराजधानी नागपूर आणि अकोला वाशिम अमरावती यवतमाळ मधून रात्रीची बससेवा सुरु करा


 "आमदार सईताई डहाके यांच्या जनता दरबारात संजय कडोळे यांची मागणी." 


 वाशिम : दि.२१ मे २०२५ रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, तहसिलदार कुणाल झाल्टे,गट विकास अधिकारी,कृषी अधिकारी,आगार व्यवस्थापक मोरे आदी सर्वच अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, शेतकरी निवास,बायपास कारंजा (लाड) येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते.  ह्या जनता दरबारात कारंजा (लाड) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या निदर्शनास आणून दिले की, "आपले कारंजा शहर हे अकोला-वाशिम-यवतमाळ-अमरावती ह्या चारही जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून शिक्षणव्यापार-न्यायालयीन व खाजगी कामासाठी कारंजेकर प्रवाशांची चारही जिल्ह्यात दररोज येणे जाणे सुरू असते. परंतु चारही जिल्ह्यातून रात्री ०८: ३० नंतर परत येण्यासाठी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा उपलब्ध नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कारंजा आगाराने दररोज दुपारी या चारही जिल्ह्यात आपल्या आगाराची बस सोडून प्रत्येक जिल्ह्यातून रात्री ०९:०० वाजता, कारंजेकर प्रवाशांची कारंजा येथे पोहोचण्याची व्यवस्था करावी. तसेच हाय कोर्टाचे कामकाजासाठी दररोज कारंजेकर वकिल आणि व्यापारी व नागरीकांना कारंजा ते उपराजधानी नागपूर जावे लागते.परंतु रात्री उपराजधानी नागपूर हून कारंजा करीता महामंडळाची बससेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असून त्यांच्या वेळेचा अपव्यय होत आहे.पूर्वी कारंजा मार्गे नागपूर बुलडाणा रातराणी बससेवा सुरु होती. परंतु ही बससेवा बंद पडल्यामुळे कारंजेकरांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याची दखल घेऊन कारंजा आगाराकडून सकाळी कारंजा - नागपूर ; व रात्री नागपूर -कारंजा बससेवा सुरु करण्यात यावी.तसेच कारंजा ते पंढरपूर बसगाडी सुरु करण्यात यावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक संजय कडोळे यांनी आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या जनता दरबारात निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य समिर देशपांडे तथा अमोल अघम,प्रवाशी सदानंद वानखडे उपस्थित होते.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या