Ticker

6/recent/ticker-posts

हंगाम २०२४-२५ वर्षात शासकीय हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी करून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या -आमदार सावरकर

हंगाम २०२४-२५ वर्षात शासकीय हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी करून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या -आमदार सावरकर


अकोला 
शेतकऱ्यांचे पाच पिके हमीभावात विकत घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यास डबल इंजन च सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत असून कृषी मंत्री नामदार शिवराज सिंग चव्हाण तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याला व सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध योजना सुरू करून लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांना व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुती करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारची वाटचाल सुरू असून या वाटचालीला शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंती आमदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस विधिमंडळ प्रतोद रणधीर सावरकर यांनी केली आहे. तूवर 
सन २०२४-२५ या वर्षी महाराष्ट्र शासनाने शासकीय हमी भाव रु. ७५०० प्रति क्विंटल दराने तुर खरेदी सुरू केली आहे, याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
 

राज्यात साधारणपणे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तूर पिक उत्पादन बाजारात विक्रीसाठी येते. शेतकऱ्यांच्या तूर उत्पादनाला शासनाच्या आधारभूत हमिभावात विक्री करता यावी या करिता शासनाने १३ फेब्रुवारी २०२५ पासून खरेदी सुरु केलेली आहे. कृषी खात्याच्या उत्पादकता अंदाजानुसार राज्यात एकूण १२ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून यावेळी ११ लाख ९०,१८६ टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी २५ टक्के म्हणजे २ लाख ९७ हजार ४३० टन तुरीची खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून नोंदणी करावी.


पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यातील हेक्टरी उत्पादकता 
प्रती हेक्टरी १४०० किलो ग्राह्य धरीत २१ हजार ६१६.२५ टन तूर खरेदी केली जाईल.तसेच अमरावती ३९,६५४ टन,यवतमाळ ३२,३८४.२५टन,बुलडाणा जिल्ह्यात खरेदी उद्दिष्ट १७,७६०.७५ टन, वाशीम ११,६७६.२५ टन, पूर्व विदर्भातील 
चंद्रपूर ११,०२३ टन वर्धा १७,८३५.७५टन, गडचिरोली १७३२ टन,नागपूर १४,५९८.२५ टन, भंडारा १२८५.७५ टन, गोंदिया ६४६ टन, मराठवाडामधे 
हिंगोली ८८६५ टन, परभणी १०,२२५.५ टन, जालना ११,७२५.५ टन, नांदेड १३,७२६.५ टन, बीड ९८९३.७५ टन, छत्रपती संभाजीनगर ७४९१.७५ टन, लातूर १२,९१८.५ टन, धाराशिव ७३.८ टन, तर उर्वरित महाराष्ट्र - सोलापूर १८,८२६.२५ टन, सांगली २०३८.७५ टन आदि नुसार एकुण २ लाख९७हजार४३० टन तुर शासन खरेदी करणार आहे शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी तसेच शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही असे आमदार रणधीर सावरकरांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी तसेच विदर्भ कोआँपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अधिका-यांना सांगितले आहे, शेतकऱ्याला त्रास होणार नाही या दृष्टीने अधिकाऱ्यांनी आखणी करावी व नियोजन करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या