भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये सहभागी होऊन विकास पर्वला आशीर्वाद द्यावा-आ. सावरकर
अकोला
मतदार हा लोकशाहीतील राजा असून त्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे आणि दिलेले वचन आणि आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कटिबद्ध असून विकास कामे चांगल्या पद्धतीने व्हावी आणि जनता जनार्दनाचा सहयोग तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आपण मतदार संघातील प्रत्येक भागाशी आशीर्वाद जनसंवाद च्या माध्यमातून संपर्क मोहीम करत आहे भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये प्रत्येक मतदारांनी सहभागी होऊन विकास पर्वला आशीर्वाद द्यावा असे आव्हान भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. मतदार संघातील वरुड ज उलका, खापरवाडी सावरगाव वेटाली, या भागातील विकास कामे , सांत्वना भेट शेतकऱ्यांची संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी अनेक ठिकाणी पूल निर्माण रस्ते विविध सभाग्रह कामकाजाची पाहणी केली.
सावरगाव येथील शेतकरी विलास पडोळे यांचा मुलगा तसेच गजानन पडोळे यांचा नातू अथर्व चे अकस्मात निधन झाले.या दुःखद घटनेची माहिती मिळतास अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी सावरगाव येथे जाऊन पडोळे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून दुःख व्यक्त केले.यावेळी राजेश नागमते, संदीप उगले,विवेक भरणे,विठ्ठल वाकोडे, अशोकराव झामरे, हरिभाऊ अवारे,नितेश तायडे,पुरुषोत्तम सिरसाट व पडोळे परिवारातील सदस्य व गावकरी उपस्थित होते. सातत्याने आमदार सावरकर शहर आणि ग्रामीण भागात जनतेची संवाद आशीर्वाद तसेच विकास कामाचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करून जनतेला अपेक्षित पाच वर्षाचा आराखडा सुरू केला आहे त्यानिमित्ताने अभियंता असलेले शेतकरी व्यापार क्षेत्राशी जाण असणारे व सर्वसामान्य वावरणारे खासदार माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात निर्माण झालेले शेतकरी चळवळीतले संघटनात्मक अभ्यासू नेतृत्व त्यांची ओळख आहे त्यानिमित्ताने जनतेचा 2014 नंतर सातत्याने विजयाचा आलेख वाढत आहे हे त्यांच्या कामाची पावती आहे
0 टिप्पण्या