बौद्ध समाज संघर्ष समिती च्या वतीने विविध मागण्या करिता धरणे आंदोलन
शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ ला बौद्ध समाज संघर्ष समिती च्या वतीने परभणी येथे घडलेल्या घटनेच्या विरोधात तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कडून अपमानास्पद उच्चाराच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे धरणे आंदोलन करण्यात आले. सदर धरणे आंदोलन बौद्ध समाज संघर्ष समिती चे जिल्हाध्यक्ष मा.गजानन भाऊ कांबळे यांच्या सह पदाधिकारांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
बौद्ध समाज संघर्ष समिती च्या मागण्या पुढीलप्रमाणे-
१.शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करीत असणाऱ्या भीमसैनकांवरील, युवक, विद्यार्थी ,यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे
२.परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केल्याने त्याची प्राणज्योत मावळली.त्या सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
३.परभणी येथील उच्चस्तरीय निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी याकरिता एक समिती घटित करण्यात यावी.
४.एल.एल .बी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला शासनाकडून तो शिकत असलेल्या शिक्षणाप्रमाणे त्याच्या आई वडिलांना आर्थिक मदत देण्यात यावी.तसेच पोलिस मारहाणीत जखमी झालेल्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी.
४.पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी.
५.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पूज्यनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद विधान केल्याने त्यांनी समस्त आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागावी.तसेच पूज्यनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल पुन्हा आक्षेपार्ह विधान करता कामा नये.याबद्दल शासनाने कडक कायदा अमलात आणावा.
या सर्व मागण्याकरिता बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला च्या धरणे आंदोलन करण्यात आले. तरी या एक दिवसीय धरने आंदोलनाला बौद्ध समाज संघर्ष समिती चे सर्व पदाधिकारी,सदस्य ,कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून धरणे दिले.
आंदोलनाला प्रामुख्याने उपस्थित उपाध्यक्ष गौतम गवई , सचिव अश्वजीत सिरसाट, उपाध्यक्ष सम्राट सुरवाडे , रोहित वानखडे, युवराज भागवत, राहुल म्हस्के, जीवन डिगे,आकाश सिरसाट,निखिल पतोंड,गौरव डोंगरे ,राजकुमार सिरसाठ, आकाश सिरसाठ ,सनी सिरसाठ,सनी मृदुंगे,आनंद वानखडे,आशिष सरपले,आदर्श खंडारे, भूषण सिरसाट, लोकेश सिरसाट, प्रमोद गवई, मंगल डोंगरे,स्वप्नील गवई,किरण सुरवाडे ,अनिल पहुरकर,सचिन गवई,गजानन साठे,सतीश मोहोड ,भारत जाधव,अजय साळवे,विजय सावंत,राजेश इंगळे,आकाश भटकर,संदेश मोहोड,नितीन रोकडे,निखिल तेलगोटे,निलेश सुरवाडे,अविश इंगळे,वैभव हिवराळे,आशिष सावळे,पक्षीराज चक्रनारायण,शुभम मोरे,संतोष तायडे ,दिलीप खंडारे,शरद इंगोले,रोशन शेगावकर,रोशन सिरसाठ ,अतिश सिरसाठ ,अमोल वानखडे,संदीप इंगळे,प्रशांत हिवराळे,आशिष गोपनारायण,कडू शेजव,प्रकाश सोनग्रे,कमलेश इंगळे,भूषण बागडे,संतोष गायकवाड,एड.डी.डी. गवई, एड.आर.एन.खंडारे, एड.ए.आर.जंजाळ प्रशांत मगर,पी.पी.पळसपगार,शुभम सुरवाळ ,संजय वानखडे,सागर निचाळ ,मनोज शेगावकर आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या