संविधान विटंबना प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाही करा
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युची उच्च स्तरिय चौकशीची मागणी
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे
प्रतिनिधी निलेश इंगळे
बार्शिटाकळी :- परभणी येथे घडलेल्या संविधान विटंबनेच्या घटनेमुळे समाजातील नागरीकांन मध्ये तिव्र दुखः आणि संताप व्यक्त होत आहे. ता .१० डिसेंबर२०२४ रोजी झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी २० डिसेंबर रोजी भिम वाटीका ते तहसिल कार्यालया पर्यंत सर्व जाती धर्मातील नागरीकांच्या वतीने संविधान गौरव रॅली काढून राजेश वझीरे तहसिलदार बार्शिटाकळी यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले, संविधानाचा अपमान हा आपल्या लोकशाहीतील मूलभूत तत्त्वांवर आघात आहे. तसेच, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यूबाबत आम्हाला तीव्र खेद वाटतो. या घटनांच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या अनेक तरुणांवर पोलिसांनी अन्यायकारकपणे गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे समाजात असंतोषाची भावना वाढत आहे.
संविधानाचा अपमान व विटंबना प्रकरणातील दोर्षीवर तात्काळ कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठोडीत झालेल्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष करण्यात यावी, व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत संविधान संरक्षणासाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेतले जावेत. तसेच, भविष्यात अशा प्रकारे निषेध करणाऱ्या नागरिकांना अन्यायकारकपणे लक्ष्य करण्यात येऊ नये. या दोन्ही घटनांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी.
संविधानाचा सन्मान राखण्यासाठी व जनतेत संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी स्थानिक तसेच राज्य पातळीवर विशेष जागृती मोहिम राबवण्यात यावी.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणावी आणि सर्वसमावेशक धोरणे राबवावीत. निवेदन देत यावेळी अमोल जामनिक, सुनिल शिरसाठ,मिलींद खाडे, तमीजखॉ, राजेश खंडारे, इम्रान खान, संतोष सुरडकर, संतोष गवई, संतोष गवर, नईमोद्दीन शेख, सै. रियासत, गोरसिंग अनिल धुरंधर, प्रकाश खाडे, भुषन गायकवाड , सचिन आगाशे,आर के जाममिक, श्रावण भातखडे,सिद्धार्थ इंगळे, रूपाली करवते, नर्मदाबाई शिरसाट, कमलाबाई जामनिक , रमाबाई जामनिक, वैशाली सुरडकर, आदीसह शेकडो नागरीक यावेळी उपस्थीत होते,
0 टिप्पण्या