अष्टपूजा नवदुर्गा उत्सव मंडळ येथे गरबा रास आणि 9 मुलींना सुकन्या योजनेचा दिला लाभ
आदरणीय सौ.सुहासिनी ताई धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरबा रास स्पर्धेचे बक्षीस वितरण.*. अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाली . गेल्या दहा वर्षापासून येथे गरभा रास आयोजन करण्यात येते.. पंचवीस वर्षे पूर्ण झाल्या निमित्त मनपा7 नंबर शाळेच्या 9 मुलींना सुकन्या योजना सुरू करून देण्यात आली. तसेच गरबा रास स्पर्धे मध्ये यावर्षीची गरभा क्वीन प्राप्ती देशमुख ही ठरली. आदरणीय सुवासिनी ते धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच मंजुषाली सावरकर अर्चनाताई शर्मा चंदाताई शर्मा, सीमाताई मांगते वहिनी, सुनिता अग्रवाल, गीतांजली शेगोकार, सारिका जयस्वाल, आरती घोगलिया , गिरी काकू, मुळावतकर काकू, ऋचा शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत गर्भारा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच सुकन्या योजनेच्या मुलींना त्यांचे पोस्टातील पुस्तक काढून देण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता सारडा, तर स्पर्धेचे परीक्षण मोक्ष शहा आणि वनश्री व्यास यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. निकीता राहुल देशमुख यांनी केले. अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री राहुल देशमुख, तसेच शिवा कराडे, प्रदीप बारड, सुनील चव्हाण, विशाल नकासकर, विशाल निंभोरकर,, सुरेश जस्वानी, सुभाष गिरे, तसेच सर्व मंडळ सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या