Ticker

6/recent/ticker-posts

माझा कचरा माझी जबाबदारी

माझा कचरा माझी जबाबदारी

अकोला
आपला भारत देश हा सुजलाम सुफलाम सश्य शामलम असा देश आहे .अशा या सुंदर आणि सौभाग्यशाली भारतामध्ये प्लास्टिकच्या अतिवापराने विद्रुपता आली आहे. 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा, असे आपण अभिमानाने म्हणत असतो परंतु हा सुंदर असलेला भारत देश अधिकच सौंदर्याने परिपूर्ण करायचा असेल तर आपल्याला प्लास्टिक मुक्त भारत अशा प्रकारच्या अभियानाची नितांत गरज आहे. प्लास्टिकच्या अतिवापराने केवळ मानवच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीतील प्रत्येक सजीव बाधित होणार आहे. सध्याच्या काळात हे थांबवणे अतिशय आवश्यक आहे हे ध्यानात घेऊन आपण प्रत्येकाने प्लास्टिक मुक्तीसाठी एक कार्यकर्ता या नात्याने पुढे होऊन प्लास्टिक मुक्तीचा ध्यास घेणे हि एक काळाची ज्वलंत आणि निगडीची गरज बनली आहे .आणि ही गंभीर बाब लक्षात घेऊन मनू ताई कन्या शाळेच्या अध्यक्षा सौभाग्यवती पल्लवी ताई कुळकर्णी मॅडम तसेच अमृत कलश विद्यालय ,मां रेणुका, ज्ञानदर्पन शाळेच्या अध्यक्षा, सन्माननीय सौ .पल्लवी ताई कुळकर्णी यांनी माननीय उपायुक्त गीता ठाकरे मॅडम यांना प्लास्टिक मुक्त अकोला बनवण्याचा ध्यास घेत निवेदन सादर केले. आणि त्यासाठी मनुताई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. धारस्कर मॅडम,पर्यवेक्षिका श्रीमती मांगे मॅडम शिक्षिका सौ. बोंबटकर मॅडम. अमृत कलश विद्यालयाचे, ज्ञान दर्पण शाळेचे तसेच मां रेणुका शाळेचे शिक्षक श्री सुसतकर सर, कुलकर्णी मॅडम, सोनवणे मॅडम श्री वाघ सर ,वानखडे ताई विद्यार्थी विद्यार्थिनी पालक या सर्वांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या