राज राजेश्वर सेतूवरून चार वर्षीय मुलगा गेला वाहून !
वाशिम अकोला जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू असून धरणातून मोर्णा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीची पातळी वाढली असून, रामसेतू पुल पाण्याखाली गेला आहे. मात्र या पुलावर गेल्या कित्येक वर्षापासून कथडे नसल्यामुळे येथे छोटे-मोठे एक्सीडेंट होत राहतात. आज या नदीवरील पुलाला कथडे असते तर या चिमुकल्याचा जीव वाचला असता. याच पुलावर धक्कादायक घटना घडली असून चार वर्षीय बालक या पुरात वाहून गेला.
दगडपरवा धरणाचा जलसाठा वाढल्याने या धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शहरातील रामसेतू पुल तसेच आसपासचा परिसर पाण्याखाली गेला आलेला पूर दुपार पर्यंत ओसरला असल्याने रामसेतू पुलावरील वाहतूक सुरू झाली मात्र येथेच मोठा घात झाला. आज दुपारच्या सुमारास शिवसेना वसाहतीतील रहिवासी सचिन बोके यांनी आपल्या चार वर्षीय मुलाला, जय बोके नदीच्या वाढलेल्या पाण्याचे दृश्य दाखवण्यासाठी रामसेतू पुलावर आणले. दुचाकीवर आलेले वडील आणि मुलगा पुलावरून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटले, आणि जय बोके नदीत वाहून गेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाने आधीच नदी काठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा दिला होता, परंतु या अपघातामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बोके कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, त्यांची मानसिक अवस्था अत्यंत गंभीर आहे. प्रशासन आणि स्थानिकांनी नदीकाठच्या लोकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक. महानगरपालिका अग्निशामक विभाग. सदर बालकाचा युद्ध पातळीवर शोध घेत असून अद्याप बालकाचा शोध लागला नाही.
0 टिप्पण्या