अमरावती विभागात वाशिम जिल्हा सलग तिसऱ्या वर्षी प्रथम, अकाेला जिल्ह्याचा ९६.४५ टक्के निकाल
दहावी परीक्षेच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याने सलग तिसऱ्या वर्षी प्थम येण्याचा बहुमान मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने सोमवारी २७ मे रोजी दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन जाहीर केला आहे. अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.७१ टक्के, अकोला जिल्ह्याचा निकाल ९६.४६ टक्के, अमरावती ९४.६१, बुलढाणा ९५.९५, आणि यवतमाळ ९५ टक्के निकाल लागला. विभागातील पाच जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्याने बारावी प्रमाणे प्रथम येण्याचा मान चढविला आहे.
अकाेला जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९७.४८ निकाल लागला आहे तर मुलांचा निकाल ९५.१७ टक्के आहे.यामध्ये ९,३३२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत.दहाविच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण नाेंदणी झालेल्या २५,३२५ विद्यार्थ्यापैकी २५,१०९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले हाेते़ त्यापैकी २४,२१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामध्ये ११ हजार ७८३ मुली उत्तीर्ण झाल्या असून, १२ हजार ४३६ मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी १२ हजार ४१६ मुले आणि ११ हजार ७८३ मुलींनी परीक्षा दिली होती. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांनी आपला निकाल बघितल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.
0 टिप्पण्या