मॉर्निंग वॉक पासून तर इविनिंग वॉक पर्यंत
रोज 25 ठिकाणी भेटी
अकोला
अहिंसा परोधर्म प्राणीमात्रावर दया ही शिकवण भगवान महावीरांनी देऊन मानवतेचा संदेश दिला आहे भगवान महावीर व जैन समाज महत्वपूर्ण योगदान असून राष्ट्र चेतना सोबत जैन समाज सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर राहतो भगवान महावीर यांचा मंत्र जीवनामध्ये अंगीकार करून मानवी जीवन सफल करावे ही जयंती निमित्त सर्वांनी संकल्पित होऊन कार्यरत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अनुप धोत्रे यांनी केले.
जय भगवान महावीर जयंती निमित्त जैन बांधवांशी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा व भगवान महावीरांना नमन केले
दिगंबर शेतांबर तसेच विविध घटकाशी संवाद अनुप धोत्रे यांनी घातले.
सकाळी मॉर्निंग वाक साठी फिरणाऱ्या जेष्ठ नागरिकांची युवासाठीची शहरातील 25 ठिकाणी भेटी देऊन मताचा जोगावा मागितला. जवळपास रोज छोट्या कानी 25 ठिकाणी बैठका घेऊन सतत 18 तास मतदारांची संपर्क ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिलेदार म्हणून व महायुतीच्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी यांचा विकास काम पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार यांच्या कामकाजाच्या ची माहिती देऊन खासदार संजू भाऊ यांनी केलेल्या कामाची माहिती आपल्या सरळ आणि सोप्या भाषेत अनुप धोत्रे जनतेशी संवाद साधत आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे कुणबी लहुजी सेना मराठा महासंघ रिपाई आठवले महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी सातत्याने जनसंपर्क करत आहे मातृशक्ती युवाशक्ती सातत्याने प्रचार करत असल्यामुळे विरोधक हदबल होऊन व्यक्तिगत टीकाटिपणीवर आले असून त्यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे योगी जी येत नसल्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून ग्रह खात्याचा उपयोग करत होते त्यांना भारतीय जनता पक्ष महायुतीने कृतीने उत्तर देऊन देशाचा गृहमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांना आमंत्रित करून त्यांची विशाल सभा आयोजित करून टिकीकारांना उत्तर दिले आहे.
राज राजेश्वर तीर्थस्थळाचा परिसराचा विकास करण्याचा संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती चे कार्यकर्ते ठीक ठिकाणी फिरत आहे तर दुसरीकडे राजराजेश्वर या ग्रामदेवतेच्या मंदिरावर दगडफेक करणारे असामाजिक तत्व दोन्ही पक्षाचे उमेदवारांकडे फिरत आहे हे जनतेच्या लक्षात येत असून ग्रामदेवतेवर व अस्मितेवर हमला करणारे असामाजिक तत्त्व यांची दादागिरी सातत्याने सुरू असून आताच अशा प्रकारचे असेल तर निवडून आल्यावर काय करेल असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे प्रकार वक्ते सिद्धार्थ शर्मा यांनी उपस्थित केला आहे. अनुप धोत्रे यांनी आतापर्यंत बारा लाख 432 मतदारांची वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधला आहे.डॉ. पंदेकृवी परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक ला येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत आगामी लोकसभा निवडणुकीत मत रुपी आशीर्वाद महायुतीचे उमेदवार श्री अनुप संजय धोत्रे यांनी मागितला.
यावेळी राजेश लुंगे,प्रशांत अवचार,पवन महल्ले,निलेश काकड,उज्जवल बामनेत,पंकज ठाकरे,योगेश मानकर,डॉ.काकडे,अक्षय जोशी,रितेश जमणारे,हर्ष चौधरी, आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या