मोदी सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याने गावागावात विकासकामे झाली!- अनुप धोत्रे!
बाळापुर
मोदी सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना अंमलात आणून जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याने गावागावात विकासाची गंगा अवतरली असल्याचे मत लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप धोत्रे यांनी व्यक्त केले. ते बाळापुर विधानसभा मतदारसंघातील कंचनपुर, लोणाग्रा, खांबोरा, मंडाळा, दुधाळा, निराट,गोपालखेड येथील विविध विकासकामाचे भुमिपुजन व लोकार्पण प्रसंगी दुधाळा येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की महिलांना,शेतकरी, कारागीर, युवाशक्ती साठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली असून गरिबी हटविण्याच्या बाता न करता गरिबी हटावी म्हणून गरजवंत लोकांना हक्काची घर तर दिलीच पण या घरावर महिला कुटुंब प्रमुखाचा हक्क असावा म्हणून घराच्या मालकी पत्रावर महिलेचे नाव असावे म्हणून तसा नियम करून महिलेचा देखील सन्मान केला आहे घराघरात उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन पोहचविण्याचे काम केले मुस्लिम महिलांचा होणारा छळ थांबण्यासाठी तिन तलाक असे महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याने महिलांना सन्मान देण्याचे काम केले.
यावेळी मा आ बळीराम सिरस्कार, तालुका अध्यक्ष देवेंद्र देवर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे, सरचिटणीस विजय फुकट,प्रशांत मानकर, शिवशंकर डिक्कर,गणेश लोड,वैभव माहोरे,दिलीप पटोकार, मनिष वैराळे, अभिमन्यू नळकांडे, विठ्ठल काळे,मनिराम टाले, मोहन पारधी, राजेश्वर वैराळे, विनायक वैराळे, पुरूषोत्तम शेळके, विनायक काळे,ईश्वर काळे,श्रीकृष्ण अवारे,भरत काळमेघ,सुनील परनाटे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
0 टिप्पण्या