कारंजा तालुक्यात मोठी कारवाई : धनज येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली अवैध ३६ लाख १३ हजार रुपयांची रोकड रक्कम जप्त
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा ते अमरावती
रस्त्यावर धनज येथे स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाने वाहनांची तपासणी करून आज ३० मार्च २०२४ रोजी तीन वाजेच्या सुमारास अमरावती कडून येणाऱ्या एमएच २७ बीएक्स १०५६ या टोयोटा एटीओस कारची तपासणी केली.
वाहनामध्ये पंकज पवन प्रेमानंद डोंगरे व मंगेश महादेव भागवतकर यांचेकडे ३६ लाख व १३ हजार अशी रोकड आढळून आली. या वाहनाचे वाहन चालक नरेंद्र ढोले हे आहेत. वाहनातील व्यक्तींना रकमेविषयी विचारले असता ही रक्कम एटीएम व बँकेमध्ये भरणे कामी घेऊन जात आहे व त्याबाबत आमच्याकडे निवडणूक
आयोगाची परवानगी व क्यूआर कोड असल्याचे सांगितले. त्या क्यूआर कोडला स्कॅन केले असता वरीलवाहनांमध्ये १६ लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी असल्याचे आढळून आले. या रकमेव्यतिरिक्त २०लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने ही रक्कम संशयास्पद असल्याचे समजले.या घटनेची माहिती स्थिर
सर्वेक्षण पथकाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे व सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांना फोनद्वारे कळविली असता ही संशयास्पद रक्कम जप्त करण्याविषयी त्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आचारसंहिता कालावधीत दहा लाखापेक्षा जास्त रक्कम अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळल्यास याबाबतचा पुढील तपास आयकर विभाग करते म्हणून
याप्रकरणी पुढील तपास करण्यात कामी आयकर विभागाला पाचारण करण्यात आले आहे. आयकर विभाग अधिकारी पोहोचेपर्यंत उपरोक्त वाहन पोलीस स्टेशन धनज या ठिकाणी आणण्यात आले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली धनज येथील
स्थिर सर्वेक्षण पथकातील स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य पुरुषोत्तम भगवान ठाकरे, ब्रह्मानंद निळकंठ राव राऊत, गजेंद्र बापूराव पाखरे, अजय नारायण ढोके, सुनील मेहरे यांनी केली आहे.भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार अवैधरित्या रोख रक्कम, दारू अथवा वाटपासाठीच्या वस्तू आढळून आल्यास याबाबतची माहिती संबंधितशासकीय यंत्रणांना देणे आवश्यक आहे.
सार्वत्रिक निवडणूक काळात समाजातील दलाल नेते स्वार्थी कार्यकर्त्यापासून मतदारांनी सावध रहा. -दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे
वाशिम : सार्वत्रिक निवडणूकीच्या काळात समाजातील विविध जातीधर्मातील संस्था संघटनेच्या नेते,पुढारी आणि कार्यकर्त्याचे पेव फुटून हे तथाकथीत नेते निवडणूकीच्या रिंगणातील उमेद्वाराचे एजंट म्हणजेच दलाल म्हणून कार्यरत होऊन तळागाळातील समाज व आपल्या जाती धर्माचे मतदार आपल्याच पाठीशी असून, आपण सांगू त्याच उमेद्वाराला मतदान करणार असल्याच्या फुशारक्या मारून वेळप्रसंगी समाजातील त्यांच्या जातीधर्माची संख्या उमेद्वारांना दाखवून किंवा आपआपल्या गावखेडे, वाड्या वस्त्या, वार्डातील मतदार आपल्या शब्दा पलीकडे नसून, आपण सांगू त्याच उमेद्वाराला निवडणूकीमध्ये मतदान करणार असल्याच्या बढाई मारून, निवडणूक रिंगणातील उमेद्वाराकडून मतदारांना मतासाठी पैसे वाटण्याच्या नावावर, उमेद्वाराकडून करोडो रुपयाची माया गोळा करून, मतदाराच्या हातावर तुरी ठेवत असतात.यामध्ये अशी तथाकथीत पुढारी दलाल मंडळी उमेद्वार आणि मतदार दोहोंचीही फसवणूक करीत असतात. त्यामुळे कृपा करून निवडणूकीच्या काळात कोणत्याही मिथ्या आश्वासनाला बळी पडू नका. उमेद्वाराच्या जेवणावळी,मटणपार्टी, दारूपार्टी मध्ये सहभागी होऊ नका. चारपाचशे रुपयांमध्ये आपले अमूल्य मत चुकीच्या उमेद्वाराला देऊ नका. "भारतिय लोकशाही मध्ये मतदार हा तळागाळातील गरीबातील गरीब किंवा ग्रामिण भागातील असला तरीसुद्धा तो मतदार राजा आहे. व त्याने स्वाभिमान बाळगून आपल्या मता बद्दल कोणताही चिल्लर मोबदला न घेता, कोणत्याही नेत्याच्या दबावाखाली न येता निवडणुकीच्या दिवशी निःशुल्क, नि:स्वार्थ व निर्भिडपणे मतदान केन्द्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेद्वाराला लोकसभा किंवा विधानसभेत पाठवीले पाहिजे." असे आवाहन दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.
अमरावती विभागात आज लोकसभा निवडणुकीचे सहा नामनिर्देशनपत्र दाखल. आतापर्यंत 472 नामनिर्देशनपत्रांची विक्री
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये चार व अकोला मतदारसंघामध्ये दोन असे एकूण सहा नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. तसेच या चारही मतदारसंघामध्ये गेल्या दोन दिवसात 472 नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज बळवंत बसवंत वानखडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने चार नामनिर्देशनपत्र दाखल केले. अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश यशवंत आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने एक व मुरलीधर लालसिंग पवार यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र दाखल केले.
विभागातील अकोला आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. अमरावती लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 75 तर 30 मार्च रोजी 95 असे आतापर्यंत एकूण 170 नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 38 तर 30 मार्च रोजी 89 असे आतापर्यंत एकूण 127 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 44 तर 30 मार्च रोजी 40 असे आतापर्यंत एकूण 84 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 67 तर 30 मार्च रोजी 24 असे आतापर्यंत एकूण 91 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले.
विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दि. 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.
0 टिप्पण्या