महाराष्ट्र शासनाने वृद्ध लोककलावंत समाजसेवकांची फसवणूक केली. - संजय कडोळे
"विदर्भ लोककलावंत संघटनेचे सार्वत्रिक निवडणूकांवर बहिष्काराचे आवाहन."
वाशिम : महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या कुटुंबावर आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून, शासनाच्या राष्ट्रिय कार्यक्रमाची जनजागृती करण्याकरीता समाजाची तन मन धनाने सेवा करणाऱ्या लोककलावंत आणि समाजसेवकांना वृद्धापकाळी शासनाने वृद्धापकाळी सन्मानाने जगण्याकरीता वाढत्या महागाईला अनुसरून वृद्ध कलावंत मानधनात वाढ करावी. वाशिम जिल्ह्यातील समाजसेवकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करावे.सर्व महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी यांना मानधन सुरु करावे.गेल्या पाच वर्षातील इच्छुक वृद्ध कलावंताना सरसकट मानधन सुरु करावे या व इतर मागण्याकरीता वेळोवेळी पाठपुरावा करून दि 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे लोककलावंताचे निर्णायक असे क्रांतिकारी धरणे आंदोलन केले होते.तसेच या मागण्या संदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचेशी ईमेल द्वारे व रजिस्टर पत्राद्वारे पत्रव्यवहार सुद्धा केला होता.परंतु शासनाने आधीच मागासलेल्या आकांक्षित अशा वाशिम जिल्ह्यातील कलावंत व समाजसेवकाच्या कोणत्याही भावनांची दखल न घेता, "अर्थसंकल्पिय अधिवेशनात लोककलावंताच्या वृद्धापकाळ मानधनात एक रुपयाची सुद्धा वाढ न करता,कलावंताची सरळ सरळ उपेक्षा व प्रतारणाच केली आहे." तसेच समाजाच्या हितासाठी आयुष्य वेचणाऱ्या जिल्ह्यातील समाजसेवकांनी सन 2018, 2019, 2022,2023 या वर्षात, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार या सन्मानाकरिता आपआपले पुरस्कारांचे प्रस्ताव दिलेले असतांना, सामाजिक न्याय विभागाने, दि 26 जून 2022 रोजी होऊ घातलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार समारंभा करीता,सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण महाराष्ट्र शासन वाशिम यांचे मार्फत त्यांना जून 2022 मध्ये त्यांना चारित्र्य प्रमाणपत्र मागीतले परंतु ऐन वेळेवर राज्यसभेची निवडणूक होताच दि 20 जून 2022 महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री -आमदार गोहाटीला निघून गेल्याने सरकार कोसळले आणि कार्यक्रम रद्द झाला. तसेच त्यानंतर परत ऑगष्ट 2023 मध्ये समाजसेवकांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मागून घेतले परंतु दि 12 मार्च 2024 रोजी मुंबई येथे घेण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्हातील सन 2018 ते 2023 या वर्षातील अनेक समाजसेवकांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे प्रस्ताव स्थानिक आमदाराच्या शिफारशीने सादर केलेले असतांनाही जिल्ह्यातील समाजसेवकांना डावलून केवळ एकाच व्यक्तीला व एकमेव संस्थेला पुरस्कार देण्यात आला तर या उलट अमरावती जिल्हयातील बावीस समाजसेवक व अकोला जिल्ह्यातील आठ व्यक्तींना डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे वाशिम जिल्हातील समाजसेवकांवर शासनाकडून अन्याय झाल्याची समाजसेवकांची भावना असून, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार निवड प्रक्रियेची रितसर चौकशी होणे गरजेचे आहे. व त्यामुळे लोककलावंत आणि समाजसेवकावरील ह्या अन्यायाची जोपर्यंत योग्य चौकशी होणार नाही तोपर्यंत विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा सार्वत्रिक निवडणूकी मध्ये मतदान करण्या बाबत सकारात्मक निर्णय घेणार नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाने सार्वत्रिक निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रचंड महागाई गगनाला भिडूनही लोककलावंताच्या मानधनात कोणतीही वाढ न केल्याने शासनाने कलावंताची फसवणूकच केली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे कडून कळविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या