Ticker

6/recent/ticker-posts

शहरात एकाच दिवशी नऊ चोऱ्या झाल्यामुळे भीतीचे वातावरण पोलीस अधीक्षक यांची आमदार सावरकरांनी घेतली भेट

शहरात एकाच दिवशी नऊ चोऱ्या झाल्यामुळे भीतीचे वातावरण पोलीस अधीक्षक यांची आमदार सावरकरांनी घेतली भेट


अकोला
अकोला शहरात वाढत्या चोऱ्या संदर्भात आज आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या भावना वाढती चोरी असमाजिक तत्त्वांचा या विषयावर भेट देऊन ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश दिले. वर्धा येथे पक्ष संघटनेच्या कामानिमित्त गेलेलेअकोला शहरात डेरे दाखल होतास आमदार रणधीर सावरकर यांनी सरळ घरी न जाता व्यापाऱ्यांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक गाठून चोरीचा तपास एलसीबी कडे देण्याचा निर्देश दिले. लवकरच चोरी करणारी टोळी यांचा पर्दाफाश होईल असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी दिला असून यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत असल्याची त्यांनी या सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांच्या अनेक अडचणी तसेच व्यापाऱ्यांना होणारा त्रास संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून तेही सकारात्मक बाबी घेऊन सर्वांचा रोजगाराचा विचार करून ताबडतोब निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. आमदार सावरकर यांच्यासोबत विजय अग्रवाल कृष्णा शर्मा वसंत बाचोका, गिरीश जोशी जयंत मसने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजू मुलचदाणी जगदीशजेठानी चंद्रकांत सिदारा, राजेश चावला, संजय नागदेव विशाल राजपाल नानक राजपाल हिरा कूपलानी हरीश आलीम चंदानी, कन्हैया आहुजा विनोद मनवानी दीप मनवाणी मोहन नागवानी ब्रह्मानंद वालेच्छा, आधी कार्यकर्ते सोबत होते ‌.


जलकुंभी, येत्या दोन दिवसात काढण्याचे काम सुरू करा आमदार सावरकर


अकोला शहरामध्ये जलकुंभी, अनेक नागरिक त्रस्त झाले असून अनेक आजार शहरांमध्ये पसरत असून यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे मोरणा नदी सोबत शहरातील सहा ठिकाणी जलकुंभी असल्यामुळे संपूर्ण शहरांमध्ये डासांचा खूप वाढला असून या संदर्भात मनपा आरोग्य विभागाने तसेच लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश आमदार रणदिवसावरकर यांनी उपायुक्त गीता ठाकरे व आरोग्य निरीक्षक यांना दिले आहे यासंदर्भात येत्या दोन दिवसात जल कुंबी युद्ध स्तरावर काढण्याचं काम सुरू करण्याची अभिवचन उपायुक्त गीता ठाकरे यांनी दिला असून शहरात साफसफाई पथदिवे सोबत जलकुंभी काढण्याच्या दृष्टीने ताबडतोब उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा असे आदेश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले यासंदर्भात ताबडतोब कारवाई करण्याची अभिवचन उपायुक्त व मनपा अधिकाऱ्यांनी दिले आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या