Ticker

6/recent/ticker-posts

कारंजातील पर्यवेक्षक व बीएलओंचा वाशिम मध्ये सत्कार संपन्न

कारंजातील पर्यवेक्षक व बीएलओंचा वाशिम मध्ये सत्कार संपन्न


कारंजा-
२५ जानेवारीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये वाशिम जिल्ह्यातील ६ पर्यवेक्षक व १८ बि.एल.ओ.चा सत्कार संपन्न झाला. यात कारंजातील पर्यवेक्षक गोपाल खाडे ,बि.एल.ओ.अल्ताब पटेल
निशांत कचरे व योगेश घोडसाळ यांचाही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व उकृष्ठ कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार दिनांक २५ जानेवारी,२०२४ रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमध्ये सन-२०२३ या कालामध्ये मतदार नोंदणी, दुरुस्ती,वगळणी यासंबधी उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या ६ पर्यवेक्षक व १८ बीएलओ यांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये करण्यात आला.२५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व काय आहे,तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची ठरु शकते याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे हे या दिनाच्या निमित्ताने सांगितलं जातं.नागरिकांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला तर योग्य प्रतिनिधी निवडून जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून लोकशाही बळकट होऊ शकते. मतदानाच्या हक्काचा वापर करत देशातील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशा प्रतिनिधीची निवड करु शकतील.सन २०११ पासून देशात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.या दिवशी केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत एक जबाबदारीही येते,ती म्हणजे लोकशाही टिकवण्याची जबाबदारी. आपल्या देशात १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव न करता कुणालाही हा अधिकार बजावता येऊ शकतो.वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशिम च्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम बुवणेशवरी एस. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणुक अधिकारी कैलास देवरे उपस्थित होते.यात कारंजातील पर्यवेक्षक गोपाल खाडे, बि.एल.ओ.अल्ताब पटेल निशांत कचरे व योगेश घोडसाळ यांचाही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पर्यवेक्षक गोपाल खाडे बि.एल.ओ.अल्ताब पटेल,निशांत कचरे व योगेश घोडसाळ यांनी कारंजाचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तहसीलदार कुणाल झाल्टे निवडणूक नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे यांच्या मार्गदर्शनात आपले उल्लेखनीय काम केले.
*वाशीम येथे ३१ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा*

पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे स्वागताध्यक्षा सुरेखाताई वाडे यांचे आवाहन


वाशिम - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज जागृतीसाठी सुरू केलेल्या मूकनायक ह्या पाक्षिकाला १०४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्समधील चिंतामणी कॉन्फरन्स हॉलमध्ये मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा व पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्षा सुरेखाताई संजूभाऊ वाडे यांनी केले आहे आहे.
 कार्यक्रमानिमित्त सम्राट टाइम्स वृत्तपत्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा आयोजन समिती अध्यक्ष पत्रकार सुनील कांबळे, उद्घाटक जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील माजी संपादक भूपेंद्र गणवीर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे दलितमित्र गोपाळराव आटोटे गुरुजी, अप्पर पोलिस अधिक्षक तांगडे, जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतिश इंगळे आदी मान्यवरांची उपस्थित लाभणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी, वाशिम जिल्हा वृत्तवाहिनी संघाचे किशोर गोमासे, महारष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, अध्यक्ष महारांष्ट्र प्रदेश व्हॉईस ऑफ मिडिया इरफान सैय्यद, साप्ताहिक माध्यम प्रतिनिधी संदीप पिंपळकर आदींची उपस्थिती राहणार आहेत.


 विशेष उपस्थितीमध्ये संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभाताई रामप्रभू सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ देवळे, समाजसेवक माणिकराव सोनोने, समाजसेवक मधुकरराव जुमडे, स्त्री रोगतज्ञ डॉ. तुषार गायकवाड, नारी शक्ती फाऊंडेशन महारष्ट्र अध्यक्षा संगीताताई वसंतराव इंगोले, पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष दौलतराव हिवराळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, जि. प. सदस्या कल्पना कैलास राऊत, समाजसेवक अनिल ताजने, समाजसेवक राजीव दारोकर, समाजसेवक अनंतकुमार जुमडे, समाजसेवक आशिष इंगोले, भाजपा अभियंता सेलचे धनंजय घुगे, वंचितच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई मिलिंद इंगळे, जिल्हा उपाध्यक्षा मेघाताई किरण डोंगरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. 
 तरी कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्षा सुरेखाताई संजूभाऊ वाडे आणि आयोजन समिती मार्गदर्शक बबनराव खिल्लारे, अध्यक्ष सुनील कांबळे, विनोद तायडे, अजय ढवळे, पप्पू घुगे, प्रमोद खडसे, संतोष वानखडे, विशाल राऊत, संदीप डोंगरे, डॉ. माधव हिवाळे, दादाराव गायकवाड, दिनेश पठाडे, राजकुमार पडघाण, महेंद्र ताजने, प्रवीण पट्टेबहादूर, संजय खडसे, माधव डोंगरदिवे आदींनी केले आहे.
----------------
 यावेळी अनिल कांबळे, मोहन शिरसाट, बबनराव खिल्लारे, विनोद तायडे, अजय ढवळे, संदीप डोंगरे, सुधाकर पखाले, सुभाष तायडे, किरण पखाले, बबन कांबळे, डॉ. माधव हिवाळे, रवी अंभोरे, वसंत इंगोले, राजाभाऊ इंगोले, नानाभाऊ देवळे, विनोद डेरे, अविनाश भगत, माणिकराव डेरे, प्रवीण आडुळे, संतोष कांबळे, बळवंत भगत, रा. ना. अंभोरे, दिगंबर सोनोने आदी पत्रकारांचा मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह, मूकनायक पुस्तक देवून सत्कार करण्यात येणार आहे.

आदिवासी कोळी बांधवांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस
लोकप्रतिनिधी फिरकले नाही : प्रशासनाकडूनही बेदखल


वाशिम - आदिवासी कोळी जमातीचे अस्तित्व वाचविण्यासाठी आणि त्यांना त्यांचे संवैधानिक हक्क मिळवून देण्यासाठी राज्यस्तरीय महाआंदोलन समितीच्या पुढाकारातुन आदिवासी कोळी बांधवांनी मंगळवार, २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार, २३ जानेवारीपासुन सुरु केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस उजाडला असून काँग्रेसचे आ. अमित झनक वगळता एकाही लोकप्रतिनिधींनी या उपोषणास भेट दिली नाही. तसेच प्रशासनाकडून हे उपोषण अद्याप बेदखल असून त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरुध्द रोष व्याप्त आहे.
  या आंदोलनात रुख्मिणी जनक मानकरी, किसन ज्ञानबा काळे व सचिन उत्तम पिठ्ठलवाड हे उपोषणास बसले आहेत. यासंदर्भात राज्यस्तरीय महाआंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये, कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राचे अर्ज सेतू कार्यालयाने वीणाअट स्वीकृत करावे. राजस्व महाअभियान मोहीम राबवून कोळी महादेव, कोळी ढोर, मल्हार कोळी, डोंगर कोळी यांना वाड्या वस्त्यांवर जाऊन अनुसुचीत जमातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावे. केंद्राचे व राज्याचे कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ विनाअट वितरीत करण्यात यावे. शबरी योजने अंतर्गत आदिवासी कोळी जमातीला घरकुल तात्काळ मंजूर करण्यात यावे यासह विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र शासन १९७६ पासून कोळी महादेव़, डोंगर कोळी़, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी या अनुसूचित जमातींबाबत उघडपणे अनास्था दाखवत असून त्यांना अनुसूचित जमातींचे कोणतेही लाभ मिळू नये यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. १९८३ नंतर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून संविधानाच्या मुुळ हेतूलाच तडा देणारे व आमच्यावरील अनुसूचित जमातींना जाचक ठरतील असे विविध संदिग्ध शासन निर्णय पारित केले गेले आहेत. विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती कै. दाजीबा पर्बत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने हे सर्व शासन निर्णय असंवैधानिक असल्याचे ठरवून ते तात्काळ रद्दबातल करण्याची शिफारस केलेली आहे. परंतू १९८६पासून आजपर्यंत शासनाने त्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता आदिवासी विकास विभागाच्या मनमानीकडे सरळ डोळेझाक केल्याचे उघड झालेले आहे. त्यामुळे आदिवासी कोळी समाजात असंतोष पसरला असून शासनाकडून समाजावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. हा अन्याय दुर करण्यासाठी शासनाने आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्या पुर्ण कराव्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मात्र सहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून या उपोषणाची दखल घेतल्या गेली नाही.

वासुदेवाच्या भूमिकेतून प्रदीप पट्टेबहादूर व संचाने सादर केले वासुदेवाची वारी लोकनृत्य
 

वाशिम : गावात सकाळच्या वेळी घरोघरी फिरून पांडुरंगावरील अभंग गवळण गात दान मागणारा वासुदेव हा लोककलाकार. वासुदेवाच्या भूमिकेत प्रदीप पट्टेबहादूर यांनी वासुदेवाची वारी हे लोकनृत्य महासंस्कृती महोत्सवात आज २८ जानेवारी रोजी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
          डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायात विजार किंवा धोतर पायघोळ अंगरखा,कमरेभोवती उपरणे गुंडाळलेले,एका हातात चिपळ्या दुसऱ्या हातात पितळी टाळ,कमरेला पांवा,मंजिरी अशी वस्त्रे आणि काखेत झोळी,गळ्यात कवड्यांच्या माळा, रंगेबिरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वेश परिधान केलेला हा वासुदेव.
         समाज प्रबोधन करणारी संस्था म्हणून वासुदेवाचा गौरव केला जातो. वासुदेव आपल्या गाण्यातून जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववाद आहे.आपण चांगले काम करीत राहावे आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे.
            छत्रपती शिवाजी महाराजांनी वासुदेवाच्या साह्याने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत.वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातील बातम्याही मिळविल्या आहेत.    
           वासुदेवाची परंपरा मराठी संस्कृतीत हजार ते बाराशे वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव या संतांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळून येतात.प्रदीप पट्टेबद्दूर व त्यांच्या सहकलावंतांनी आज महासंस्कृती महोत्सवात वासुदेवाची वारी हे लोकनृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांनी या लोकनृत्याला उत्तम दाद दिली.

३० जानेवारीला महासंस्कृती महोत्सवात शिवचरित्रावर संगीतमय किर्तन


वाशिम : सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन, वाशिम यांच्या संयुक्तवतीने २७ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत अस्सल व-हाडी भाषेत विविध विषयांवर समाजोपयोगी उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पी.एस.खंदारे व सह कलावंतांचा आदर्श जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर संगीतमय किर्तनाचे आयोजन ३० जानेवारी २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल,वाशिम येथे केले आहे.या शिवचरित्र संगीतमय किर्तनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्राचा समृद्ध संस्कृती वारसा टिकला पाहिजे.-जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन

वाशिम : महाराष्ट्राच्या लोककला जिवंत ठेवून ह्या लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांना प्रोत्साहन देणे आज गरजेचे आहे. महाराष्ट्राचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा टिकला पाहिजे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले. 
               सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन,वाशिम यांच्या संयुक्त वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन आज २७ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले.यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून श्री.ठाकरे बोलत होते.महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून आमदार ऍड.किरणराव सरनाईक,पोलीस अधीक्षक अनुज तारे,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व जिल्हा परिषद सदस्य आर. के.राठोड यांची उपस्थिती होती.
           ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांना व कलावतांच्या गुणांना वाव दयावा. महोत्सवाच्या निमित्ताने येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागृत होत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने हे शिवकालीन चित्र व शस्त्र प्रदर्शन पहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
           उदघाटक म्हणून बोलतांना श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,हा महोत्सव महाराष्ट्राच्या मातीशी जुळला आहे.राज्याच्या लोककला ह्या जिवंत राहिल्या पाहिजे,तसेच ह्या लोककला सादर करणाऱ्या स्थानिक लोककलावंतांना महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून ह्या लोककला सादर करण्याची संधी देण्यात येत आहे.नव्या पिढीला ह्या लोककला माहीत होऊन त्याची जपवणूक झाली पाहिजे.असे त्या यावेळी म्हणाल्या. 
    आमदार ऍड.सरनाईक म्हणाले, वाशिम ही वाकाटक राजाची पूर्वी राजधानी होती.महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून जुन्या लोककला आपल्याला बघायला मिळणार आहे. लुप्त होत चाललेल्या प्राचीन लोककला ह्या जिवंत राहिल्या पाहिजे.या लोककलांची ओळख विशेषता विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. जिल्ह्यातील विविध शाळांनी विद्यार्थ्यांना येथे आणून त्यांना प्रदर्शन आणि लोककलांची ओळख करून द्यावी.त्यामुळे मुलांना महाराष्ट्राच्या समृद्ध कलासंस्कृतीचे आगळेवेगळे रूप बघायला मिळणार आहे.असे त्यांनी सांगितले. 
            प्रास्ताविकातून बोलताना श्री.घुगे म्हणाले,महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या प्राचीन समृद्ध लोककलांची ओळख होणार आहे.स्थानिक लोककलावंतांना या महोत्सवातून प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  
           यावेळी कवी गोविंद चतरकर यांच्या *आठवणीतील घर* या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.साहित्यिक तथा लेखक मोहन शिरसाठ यांनी वाशिम *जिल्ह्याचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढा* यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गजानन वाघ यांनी केले.  
            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा संकुलातील पटांगणावर लावण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि शिवकालीन संस्कृतीचा संदेश देणाऱ्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.या महोत्सवाच्या निमित्ताने रिसोड येथील रांगोळी कलाकार प्रतीक्षा साबळे हिने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी,नागरिकांची विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
  
सांस्कृतिक कार्यक्रम देत आहे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला उजाळा


आपल्या महाराष्ट्राला समृद्ध कला आणि संस्कृतीचा वारसा आहे. प्राचीन लोककला आणि संस्कृतीची नागरिकांना विशेषतः नव्या पिढीला ओळख व्हावी हा महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आहे.आज महासंस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात *गर्जा महाराष्ट्र माझा* या महाराष्ट्र गीताने करण्यात आली. हे महाराष्ट्र गीत लोककवी कलावंत शाहीर विलास भालेराव आणि सहकारी कलावंतांनी केली. वरद विजय काळे या बाल कलावंताने *आऊसाहेब मी शिवबा बोलतोय* हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यश तर एस.एम.सी शाळेचा विद्यार्थी बालकलाकार हरिओम केशव मगर याने आपल्या बोबड्या बोलीत छत्रपती महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर करून उपस्थितांकडुन टाळ्या घेतल्या. श्री.बाकलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी *महाराष्ट्राची थोरवी* हा कार्यक्रम सादर केला.वाशिम येथील बालासाहेब व्यायाम प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी मंडळाचे अध्यक्ष गणेश सावळकर यांच्या नेतृत्वात चित्तथरारक प्राचीन लोककला, साहसी खेळांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या