विमानतळ विस्तारीकरणाचा प्रकल्प तातडीने राबवा- आ.सावरकर
अकोला
अकोला शहर विमानतळ विस्तारीकरणाचा प्रकल्प तातडीने राबवा अशी आग्रही मागणी आमदार रणधीर सावरकरांनी मा. मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत झालेल्या व्ही.सी. बैठकीत केली
अकोला येथील विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेला आहे, आमदार रणधीर सावरकर यांनी याबाबत सततचा पाठपुरावा, विधानसभेतील तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना अशा सांसदीय आयुधांद्वारे प्रश्न लावून धरला, विधानसभा सभा अधिवेशनात शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज माननीय नामदार शंभूराजे देसाई यांनी याबाबत व्ही.सी.द्वारे बैठक आयोजित केली होती, यासंदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजित दादा पवार यांनी विमानतळ होण्यास मदत करू अशी अभिवचन दिले होते तसेच सातत्याने अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ धोत्रे या संदर्भात आगरी भूमिका घेत होते त्यांच्या प्रयत्नामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जागा उपलब्ध करून दिली होती व या संदर्भात केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1400 मीटर वरून 1800 मीटर करण्याकरिता कृषी विद्यापीठाकडून जमीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच या कामाकरिता खाजगी जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता या खाजगी जमिनीपोटी सुमारे 196 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता अकोला येथील विमानतळ केंद्र शासनाचा असल्याने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन संपादनाची कार्यवाही राज्य शासनाकडून करावयाची आहे, जमीन संपादनासाठी खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत सरळ वाटाघाटी करून मधल्या मार्गाने जमिनीच्या खर्च निर्धारित करण्याच्या सूचना दिल्या होत्या, याकरिता जिल्हाधिकारी यांच्या समन्वयातून जमिन संपादनाचा खर्च निश्चित करण्यात यावा, बैठकीत सदरची धावपट्टी 2500 मीटर करण्यात यावी यावर सुद्धा चर्चा करण्यात आली, या दोन्ही प्रस्तावांची व्यवहार्यता तपासून याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी सादर करावा अशा सुचना देण्यात आल्या, या दोन्ही टप्प्यापैकी प्रथम टप्प्यात 1800 मीटर लांबीची धावपट्टी तयार करून हवाई वाहतूक लवकर कशी सुरू करता येईल या दृष्टीने शासनाने विचार करावा अशी मागणी आमदार सावरकर यांनी बैठकीत केली तथापि दुसऱ्या टप्प्यात या धावपट्टीची लांबी वाढविण्यात यावी असे त्यांनी सांगितले, हवाई वाहतूक तातडीने सुरू करता यावी याकरिता आमदार यांनी मांडलेली सूचना मा. मंत्री शंभूराजे देसाई यांनी ग्राह्य धरावी अशी सूचना केली, त्या सार जिल्हाधिकारी अकोला यांनी पुढील कार्यवाही करावी असे सांगितले, संदर्भात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकार आशावाद असून सकारात्मक भूमिका घेऊन अकोल्यात विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने व आर्थिक भौगोलिक विकासाच्या दृष्टीने विमानतळ हा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला याबद्दल सुद्धा आमदार सावरकर यांनी सरकारचे अभिनंदन व्यक्त केले आहे व लवकरच याच्यातून मार्ग निघेल असाही आशावाद व्यक्त केला. आपले ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत होते तसेच आपले सहकारी वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे हे सुद्धा विमानतळ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याची त्यांनी सांगितले
विश्वकर्मा योजनेची माहिती संदर्भात मार्गदर्शन- आ. अनिल सोले
अकोला समाजातील वंचित पिढी त्यांना केवळ राजकीय फायद्यासाठी लाभ न घेता त्यांना आर्थिक सामाजिक भौगोलिक शैक्षणिक सोबत सन्मानाचा स्थान प्राप्त व्हावा व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वर्चस्व राहावं यासाठी छोट्या छोट्या समाजातील कल्याणासाठी विश्वातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना लागू करून देशातील 28 राज्यांमध्ये रोजगार सोबत स्वावलंबी आत्मनिर्भर भारत निर्माणच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे या योजनेचा लाभ भाजप कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला पोचून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा राष्ट्र एकात्मता मानवतावाद या मंत्राचा वापर करून नारायणाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध व्हावे असे आव्हान नागपूरचे माजी महापौर आजी माझी आमदार अनिल सोले यांनी केले . स्थानिक बाळासाहेब टोपले, सभागृह तिथे आयोजित विश्वकर्मा योजनेची माहिती संदर्भात विश्वकर्मा संयोजक म्हणून ते मार्गदर्शन करत होते. सविस्तर वृत्त येथे👆 पहा...
यावेळी मंचावर विदर्भ विभाग विश्वकर्मा संयोजक आशिष वांदिले, किशोर पाटील जयंत मसने, विजय अग्रवाल, व महानगर अध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, माजी महापौर विजय अग्रवाल, संघटन सरचिटनिस संजय गोटफोडे, ॲड देवाशिष काकड, सौ अम्रपाली उपरवट, रमेश अलकरी, रावसाहेब कांबे, संतोष पांडे ,दिलीप मिश्रा, दिलीप भरणे राजेंद्र गिरी , सागर सागर शेगोकार, गणेश वडतकर , निलेश नीनोरे , संदीप गावंडे, विनोद मापारी ,सतीश ढगे, बाल टाले, , तुषार भिरड, धनंजय धाबले, राजेश चौधरी, सौ वैशाली देवकते, नवीन जाधव, नितीन गवळी, अतुल गोमासे, अमोल गीते, राजेश धोटे,अमोल मोहोकर, कपिल बुंदेले , कुलदीप दुबे, सोनू देशमुख, वैभव तराळे , कपिल खरप, चंदू महाजन, विठ्ठल देशमुख, उमेश श्रीवास्तव, केशव हेडा, शुभम चंदन, संजय झाडोकार, मयूर जाधव, संतोष डोंगरे ,प्रकाश घोगलिया, हर्ष चौधरी, हेमंत सटवाले, बबलू पलसपगार,निरंजन अहिरवार, राहुल चौरसिया, एडवोकेटदेव आशिष काकड , संतोष पांडे निलेश निनोरे रमेश करिअर दिलीप मिश्रा धनंजय धबाले अमोल गीते , आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी 127 समाजाला याचा लाभ मिळत असून छोट्या छोट्या घटकांना जोडण्याचा काम करून त्यांचा आत्मनिर्वाण करण्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या बांधवांना मानवतेच्या नात्याने कार्य करावे अशीही आवाहन यावेळी अनिल सोले यांनी केले. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सुद्धा विश्वकर्मा जयंती निमित्त झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने व आत्मनिर्भर भारतमान करण्याच्या दृष्टीने कार्य लागल्या सेनेमध्ये आत्मनिर्भरता च्या कार्याला गती दिली आहे देशामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाले आहे डिजिटल इंडिया पासून तर छोट्या छोट्या मन की बात क्या माध्यमातून चांगल्या कामाला प्रसिद्धी देऊन त्यांच्या रोजगाराच्या कामाची माहिती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने व केवळ महात्मा गांधी यांचे नाव राजकारणासाठी उपयोग करणारे काँग्रेस पेक्षा खादीचा प्रचार प्रसार व वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात देशात सुरू झाला आहे ही किमया केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतो यावेळी विजय अग्रवाल म्हणाले. माझे सूत्रसंचालन एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या