Ticker

6/recent/ticker-posts

केंद्र सरकारच्या 169 योजनेचा लाभ घेण्याचे आ. सावरकर यांचे आवाहन 

केंद्र सरकारच्या 169 योजनेचा लाभ घेण्याचे आ. सावरकर यांचे आवाहन 


विकसित भारत संकल्प यात्रा माध्यमातून केंद्र सरकारच्या 169 योजनेचा लाभ घ्यावा व त्यामध्ये आपले नाव नोंदवून घरपोच सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू करून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सुरू केले आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. विकसित भारत विकसित समाज मोहिमे अंतर्गत विकास कामाच्या रथाचे कावसा येथे आगमन प्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांनी स्वागत करून लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यासोबत केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची उपस्थितांना माहिती दिली-
 देशाचे पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात देशाला विकासाभिमुख सक्षम नेतृत्व देण्यासोबतच भारत देशाला जागतिक नेतृत्व देण्यासाठी सिद्ध केलेले आहे. देशाचा सर्वजनिक विकास करतांना ग्राम पातळीवर सार्वजनिक तसेच वैयक्तिक लाभाच्या विकासाच्या योजना राबविल्या आहेत. 


या विकास योजनांची माहिती देण्यासाठी व लाभार्थ्यांना लाभाचीत करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यासाठी देशभरातील नागरिकांना योजनांची माहिती व्हावी या करिता हा विकास रथ देशभर मार्गस्थ केला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना चा समावेश मोठ्या संख्येने या यात्रेच्या माध्यमातून होत असून जातपात धर्म विसरून विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी या विकसित रथाचा उपयोग घ्यावा अशी आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सावरकर यांनी केले.अकोट तालुक्यातील कवसा येथे या विकास रथाचे स्वागत करून आमदार रणधीर सावरकर यांनी पुढे मार्गस्थ करण्याकरिता हिरवी झेंडी दिली. या प्रसंगी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासोबतच त्यांनी लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप केले. योजनेच्या लाभासाठी यात्रा या पद्धतीने २६ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जाईल. ग्रामीण/शहरी/पालिकास्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत योजनांची माहिती पोचविणे आणि लाभार्थ्यास त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा हेतू आहे. भारताचा आत्मा गावात आहे. त्यामुळे गावाचा विकासझाला तरच देशाचा विकास होईल. यास्तव लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजना गावागावातील लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्यापाहिजे,असा संदेश देशाचे पंतप्रधान मा.ना मोदी यांनी देशवासियांना दिला आहे. 


 या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सौ, हरिदिनी ताई वाघोडे, उपसभापती संतोष शिवरकर, राजाभाऊ नागमते, गजानन नळे,अनुप साबळे, विनोद साबळे, मोहन सावरकर, सतीश सावरकर, बबलू पळसकर, विठ्ठल वाकोडे, शिवलाल बुटे, शिवकुमार शर्मा, जिल्हा संयोजक गोपाल मंडळे, गट विकास अधिकारी रुद्रकार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात नवीन 25000 लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून सरकारी योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी विकसित भारत विकसित समाज विकसित परिसर समाजातील सर्व घटकांचा न्याय आर्थिक सबलीकरण करण्यासाठी देशभरातील 550 जिल्ह्यामध्ये हा रथ फिरत असून मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पहिले हे सरकार आहे की जे समाजातील वंचित पीडित व समाजातील शेवटच्या घटकाचा न्याय मिळवून देण्यासाठी गप्पांचा बाजार न करता सातत्याने योजनेचा प्रचार ते त्याला येणारी अडचण दूर करण्यासाठी व घरपोच सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या या रथाच्या माध्यमातून सिद्ध झाल्याची ही आमदार रणधीर सावरकर यांनी सांगून जिल्ह्या त मोठ्या प्रमाणात लाभार्थी चा लाभ मिळणार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या