गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
अकोला संत भगवान बाबा यांनी अध्यात्म वारकरी संप्रदाय सोबत मानवतेचे कार्य करून समाजातील वंचित पिढीत सोबत समाजातील सर्व घटकांना आपल्या सेवा आणि धर्म भक्ती श्रद्धेच्या मार्गाने एकत्रित करण्याचं काम केल्यामुळे देशभरात मोठ्या संख्येने त्यांचे भक्त असल्यामुळे बीड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरून भाविक येत असतात यावरून त्याचे धनी ऐश्वर्य भक्ती आणि इच्छापूर्ती असणाऱ्या संतांना नमन करणे त्यांच्या विचाराने चालणे कर्तव्य असून अशा संतांच्या मुळे वारकरी संप्रदाय व सनातन धर्माची पताका सातत्याने कायम असल्याची प्रतिपादन आयपीएस अधिकारी डॉक्टर विजय फंड यांनी केले वंजारी समाजसेवा फाउंडेशन अकोला च्या वतीने ऐश्वर्या संपन्न श्री संत भगवान बाबा यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद कर्मचारी भवन सिव्हिल लाईन रोड अकोला येथे संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात "शैक्षणिक ध्येयपूर्ती " या विषयावर डॉ. विजयकुमार फड (IAS) यांचे सह समाजातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षणाचे महत्त्व व सध्याची परिस्थिती यावर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ.विजयकुमार फड (IAS) औरंगाबाद,प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून मा.संदीप घुगे साहेब (IPS) पोलीस अधीक्षक अकोला, विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून डॉ.नंदकुमार पालवे संस्थापक सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड बुलढाणा,श्री विश्वनाथ जी घुगे साहेब निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम, सुनील वारे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती विभाग अमरावती, डॉ.प्रकाश नागरे असोसिएट डीन व प्राचार्य कृषी महाविद्यालय पंजाबराव कृषी महाविद्यालय अकोला,डॉ.साधना कराड सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग अमरावती हे होते._यावेळी मान्यवरांनी भगवान बाबा तसेच समाजाला आवश्यक असलेल्या बाबी संदर्भात व सध्याची परिस्थिती यावर प्रकाश टाकला.
सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित मुलांना आपल्या भविष्यातील करिअरच्या संधी व परिश्रम घेण्याबद्दल चे व्यवस्थापन याबद्दल डॉ. विजयकुमार फड यांनी विशेष मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला यांनी यशाचा मंत्र सांगून अपयशावर कशा पद्धतीने आपल्या जिद्दीने समोर गेलं पाहिजे असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले._*
*_आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये इयत्ता दहावी,बारावी व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुलांचे यथोचित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला._*
*_सोबतच समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सुद्धा गुणगौरव आजच्या कार्यक्रमांमध्ये करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती.आजच्या कार्यक्रमाचे बहारदार संचालन डॉ.जितेंद्र काठोळे उपाध्यक्ष वंजारी समाजसेवा फाउंडेशन अकोला यांनी केले तर प्रास्ताविक श्री विशाल घुगे अध्यक्ष व आभार प्रदर्शन श्री प्रेम कुमार सानप सहसचिव वंजारी समाजसेवा फाउंडेशन अकोला यांनी केले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची, पालकांची व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये वंजारी समाजसेवा फाउंडेशन अकोला च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व वंजारी समाज सेवा समिती अकोला जिल्हा तसेच सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या