रस्त्याची दुर्दशा व शेतकरी कष्टकरी नागरीकांचे हाल, दिला आंदोलनाचा ईशारा
अकोला ~ अनेक वर्षापासून बार्शीटाकळी ते महागाव, महागाव ते राजनखेड ते रूद्राईणी देवी ( चिंचोली) या रस्त्याची दैनिय अवस्था झालेली आहे. त्या रस्त्याची दुर्दशा व शेतकरी कष्टकरी नागरीकांचे हाल पाहून मातोश्री प्रतिष्ठान च्या वतीने मागील वर्षी नवरात्राच्या वेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गोंधळ आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषद च्या वतीने 5 लाख रुपयांच्या निधीतुन थातूरमातूर का होईना लाल माती मिश्रित मुरूम टाकण्यात आला व आजूबाजूचे काटेरी झुळूप काढण्यात आले . हा सर्व प्रकार गावातील वयोवृद्ध , पुढारी व तरुण बघत राहिले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री यांच्या निधीतून मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेच्या निधीतून सात कोटी रुपयांचा रस्ता मंजूरात करण्यात आला. त्याचे गावभर फलक सुद्धा लावण्यात आले. पण प्रत्यक्षात एक वर्षे उलटून सुद्धा रोड हा कागदोपत्रीच राहिलेला आहे. त्या अनुषंगाने आज दि 12/10/2023 रोजी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने आज जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांना स्मरण पत्र देण्यात आले. व त्यांना इशारा देण्यात आला. असे योगेश जगदीश ढोरे मातोश्री प्रतिष्ठान अकोला यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 टिप्पण्या