Ticker

6/recent/ticker-posts

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या निवडक 21 अभंगांच्या 'अभंग एकविशी' पुस्तकाचे प्रकाशन

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या निवडक
21 अभंगांच्या 'अभंग एकविशी' पुस्तकाचे प्रकाशन


जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या असंख्य अभंगातून 21 अभंग निवडून ते 'अभंग एकविशी' पुस्तकाच्या रूपाने आज प्रकाशित करण्यात येत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. त्याबद्दल अमोल मिटकरी आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

जगतगुरु संत तुकाराम हे काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगाना व्यावहारिकतेची जोड होती. सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार त्यांनी साहित्यात मांडले. 


सविस्तर वृत्त पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी लिहिलेले अभंग आजच्या आधुनिक युगातही तितकेच समर्पक, व्यवहार्य, मार्गदर्शक आहेत. 

संत तुकोबारायांचे अभंग हे मानवी जीवनावरील महाभाष्य आहेत. या महाभाष्यातील 21 अभंग निवडण्याचे आणि 'अभंग एकविशी' पुस्तिकारुपाने प्रसिद्ध करण्याचे कठीण काम मिटकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलें आहे.

'अभंग एकविशी- तुकोबारायांची' पुस्तिका प्रकाशनाच्या उपक्रम प्रत्यक्षात आणल्याबद्दल 'गाथा परिवार' तसेच आ.अमोल मिटकरी यांचे अभिनंदन करण्यात आले.


 'गाथा परिवार', आ.अमोल मिटकरी आणि आपल्यापैकी अनेक जण, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या प्रचार-प्रसारासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या प्रयत्नांना आणि उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा देतो.


विधीमंडळातील माझे सहकारी आ. अमोल मिटकरी हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील संदेश शेतकरी, कष्टकरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून 'गाथा परिवारा'च्या माध्यमातून 'वारी आपल्या दारी' संकल्पना त्यांनी यशस्वीपणे राबविली. 

आज, 'अभंग एकविशी' पुस्तिकेचं प्रकाशन होत आहे. या माध्यमातून तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलन, सर्वधर्मसमभावा संदर्भातील विचार, शेतकरी, कष्टकरी, सैनिक वर्गाला संत तुकाराम महाराजांनी दिलेला संदेश, मानवी मूल्ये रुजवण्यासाठी केलेले प्रयत्न या साऱ्या गोष्टी, शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहचवण्याचा आ. अमोल मिटकरी यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

'अभंग एकविशी-तुकोबारायांची' पुस्तिकेचा उपक्रम राबविल्याबद्दल 'गाथा परिवारा'चे, आ.अमोल मिटकरी यांचे अभिनंदन. 'अभंग एकविशी' उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या