Ticker

6/recent/ticker-posts

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज- आ. रणधीर सावरकर

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज- आ. रणधीर सावरकर


अकोला
 भारत शेतीप्रधान देश असून शेतकरी सुखी तर देश सुखी बदलत्या हवामानामुळे देशातील व राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्याला मदत देताना त्यामध्ये सुधारणा करून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याचे सभागृहात आमदार रणधीर सावरकर यांनी 18 जुलै ते 23 जुलै पर्यंत पावसामुळे शहरी व ग्रामीण भाग जनजीवन अस्त्वस्त झाले असून याकडे शासनाचे लक्ष प्रश्नोत्तराच्या आधी प्रश्न उपस्थित करून सभागृहात ग्रामीण व शहरी भागाचा आवाज बुलंद केला.


विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्यात आमदार रणधीर सावरकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना होणारा नुकसान शासनाची मदत निधी शेतकऱ्यांची अपेक्षा ग्रामस्थांची व्यवस्था व्यथा तसेच शहरी भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान यासंदर्भात मदतीचे निकष बदलण्याची मागणी सभागृहात केली. व सामान्यांच्या अपेक्षा शेतकऱ्यांची अवस्था शेत जमिनीचे नुकसान,अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात 18 जुलै ते 23 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन आणि शेत पिकांचे नुकसान तसेच नागरी वस्तीमधील नुकसानीचे बाबत सर्वेक्षण व अंदाज घेण्यासाठी प्रशासनाने कशाप्रकारे कारवाई कारवाई करावी याबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी आज सभागृहात प्रश्नोत्तरात तासाच्या आधी याबाबत प्रश्न उपस्थित केला, सभागृहांमध्ये शेती शेतकरी, पिक आणि जमीनीचे झालेले नुकसान याबाबत आवाज उठवून, शासनाने याबाबत सुधारणा करून काही धोरणात्मक बाबीची आखणी करणे गरजेचे आहे , यासाठी महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण सूचना केल्या, शासनाने तातडीने याबाबत अभ्यास व अंमलबजावणी करून कार्यवाहीची दिशा ठरवावी अशी मागणी सभागृहात केली, आमदार रणधीर सावरकर सातत्याने अभ्यासपूर्व मांडणी करणारे आमदार म्हणून ओळख असून सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेषतः पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या विधिमंडळ व विधिमंडळाच्या बाहेर व्यक्त करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली घडलेले शेतकरी नेते असून अतिवृष्टी झाल्यानंतर सातत्याने आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणारे लोकप्रतिनिधी असून शहरी व ग्रामीण भागाची जाण असणारे त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असणारे आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहामध्ये जोरदार आवाज उठून शासनाचे लक्ष वेधून कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे तसेच महसूल मंत्री नामदार राधाकिसन विखे पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे लक्ष वेधले आहे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागाला व शहरी भागाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व शासनाने दुरुस्ती करून सुधारणा करून मदती व पाहणी मध्ये सुधारणा करावी अशी मागणी अभ्यासपूर्ण होणार शेतकऱ्यांना त्रास ग्रामीण भागात होणारी अडचण याचं सविस्तर विवेचन आपल्या मागणी द्वारे केली


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या