खेट्रीच्या सरपंचाविरुद्ध तक्रारीचे सत्र सुरूच
तीन महिन्यात अपात्रतेसह १८ तक्रारी , गावाचा विकास खुंटला
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्ध तक्रारीचे सत्र सुरूच आहे. तीन महिन्यात विरोधकाकडून अपात्रतेसह १८ तक्रारी करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. गावाच्या विकासासाठी उत्साहीत असलेले सरपंच जहूर खान, हे जनतेतून निवडून आल्यापासूनच विरोधकाकडून तक्रारीवर तक्रारी केल्या जात असल्याने गावाचा विकास खुंटल्याने ग्रामस्थांमध्ये संताप्त व्यक्त केला जात आहे. तक्रारीमुळे सरपंच हदबल झाले असून, विनाकारण प्रत्येक तक्रारीच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सरपंच जहुर खान यांनी केला आहे. आजी-माजी दिग्गजांचा पराभाव केल्याने विरोधकामध्ये संतापाची लाट उसळली असून, सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्या पासूनच तक्रारीचे सत्र सुरूच आहे.
प्रतिक्रिया
गावाचा विकास करण्यासाठी उत्साहीत असल्याने तसेच ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा पराभाव झाल्याचा राग मनात ठेवून बिनबुडाच्या तक्रारी केल्या जात आहे. सक्षमपणे लढा देऊन गावाचा विकास करू
जहुर खान सरपंच खेट्री
प्रतिक्रिया
आजी-माजी दिग्गजांचा पराभाव झाल्याने हेतूपरस्पर सरपंचाविरुद्ध विनाकारण तक्रारी केल्या जात असल्याने गावाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विकास कामात सहकार्य करण्याची गरज आहे.
मो. अयाज मो. ताज ग्रामस्थ खेट्री
0 टिप्पण्या