काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गौप्यस्फोट! महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा येणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी अकोट येथे सुधाकर गणगणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी आज होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले उच्च न्यायालय हे संविधानिक बाबी लक्षात घेऊनच निकाल जाहीर करेल, सध्याचं सरकार हे असंविधानिक सरकार स्थापित झाले आहे. या सरकारला कुठलाही संविधानिक आधार नाही. त्यामुळे हे सरकार किती काळ टिकेल सांगता येणार नाही. शेडूल ट्रेनच्या आधारावरच न्यायालयाचा निर्णय लागेल असा विश्वास यावेळी नाना पटोले यांनी दाखविला. पक्षांतर्गत कायदा नुसार 16 आमदारांची जी पहीली यादी दिली होती ती असवैधानिक आहे त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द व्हावी हा पक्षांतर्गत कायदा सांगतो. त्यामुळे ही सत्ता असवैधानिक आहे. त्यांनी केलेली कुठलेही कामे ही असंवैधानिकच ठरतात, असे मत व्यक्त केले.
संवैधानिक पद्धतीने राज्याचे कामकाज चालावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांनी घाई घाईने शनिवारी, रविवारी ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करणे, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांची शपथविधी करून घेने आणि ज्या पद्धतीने ही घाई केली आहे, त्यामधून राजकारण होताना दिसत आहे, यामधून भारतीय जनता पार्टीला सह राज्यपालांनाही संविधान नियमांचे देणेघेणे नसल्याचे चित्र दिसत आहे. शेड्युल ट्रेनमध्ये जी चर्चा झाली, त्यामध्ये कपिल सिब्बल आणि मनोज सिग्ने यांच्या वक्तव्यानुसार 16 आमदार जर अपात्र झाले तर नक्कीच पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊ शकते, असे भाकीत यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. त्याचबरोबर देशात आतंकवाद निर्माण करण्याचे केंद्र उघडल्या गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान असा वाद निर्माण करून एक राजकारण खेळल्या जात आहे. अशा पद्धतीची कार्यालय प्रत्येक राज्यात निर्माण केली आहेत, ती बंद करायला पाहिजेत परंतु या सर्व गोष्टीकडे जाणून-बजून दुर्लक्ष केल्या जात आहे. याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
0 टिप्पण्या