Ticker

6/recent/ticker-posts

आ. रणधीर सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बहुकल्यानकारी योजनांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद स्लग - हजारो नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ

आ. रणधीर सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बहुकल्यानकारी योजनांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्लग - हजारो नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ


अकोला:
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्राम पंचायत कार्यलय प्रांगण बाभूळगाव जहाँगीर येथे १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत नवीन राशन कार्ड, राशन कार्ड दुरुस्त करणे, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अर्ज भरणे, ई श्रम कार्ड काढणे, उज्वला गस योजनेचे फॉर्म भरणे, बांधकाम कामगार सदस्य नोदणी, कोविड लसीकरण प्रमाणपत्र आदी बहुकल्याणकारी शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला प्रमुख उपस्थिती अनुप धोत्रे, माधव मानकर,  चंद्रशेखर पांडे गुरुजी,अंबादास उमाळे, प्रवीण पाटील, सरपंच प्रतिभाताई गणेशराव गावंडे, प्रमोद  ढोमणे, किशोर  काकडे, देवेंद्र देवर, विनायक पाटील, रवी गावंडे, विठ्‍ठलराव इंगळे, अनुप काकड, विशाल जयस्वाल, उमेश गावंडे, संतोष कोकाटे, संतोश डोंगरे, प्रशांत उबाळे, आशिष बोबडे, गोपाल चव्हाण, किशोर हागवणे, सतीश गावंडे, , नितीन तोंडे, निलेश काकड, नितीन भगत, गजानन वानरे, अमोल तावरे, सशेर पठाण,भुषण बढे, अतुल हगवणे, अंकुश साबळे, निखिल बढे,  यांची लाभणार होती. यावेळी मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.


 यानंतर शिबिराचे उदघाटन अनुप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या बहुकल्यानकारी शिबीराचे आयोजक भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पांडे गुरुजी, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील हगवणे यांचे कौतुक केले. या शिबिराचा लाभ परीसरातील हजारो नागरिकांनी घेतला. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजक  आयोजक मंडळींनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर पांडे गुरुजी तर आभारप्रदर्शन प्रविण पाटील हगवणे यांनी केले.


मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजनेद्वारे ७५९ लाख मे. टन अन्न-धान्याचे वितरण
भाजपाचे आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांची माहिती

अकोला
कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी झोपू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे मार्च २२ पर्यंत राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना ७५९ लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरित करण्यात आल्याचे तर राज्य सरकारांमार्फत ८० कोटी लाभार्थ्यांना  ६९० लाख मेट्रिक टन अन्न-धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल. यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त  सामाजिक पंधरावडा निमित्य मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची  त्यांना  ते बोलत होते. या योजनेवर मोदी सरकारने आतापर्यंत ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्याचेही आमदार सावरकर महानगराध्यक्ष अग्रवाल यांनी सांगितले. 


ते म्हणाले की, २६ मार्च २०२० रोजी कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या काळात गोर-गरिब, श्रमिक, कामगार यांची उपासमार होऊ नये यासाठी मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली. या योजनेतून ८० कोटी लाभार्थ्यांना ५ किलो गहू, तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाते.या योजनेची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या काळात गरीब कल्याण अन्न योजनेतून राज्य सरकारांद्वारे ६९० लाख मेट्रिक टन अन्न-धान्य वाटप करण्यात आले आहे. या योजनेच्या सहाव्या टप्प्यात म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंत राज्य सरकारांना २४४ लाख टन अन्न-धान्य दिले जाणार आहे. त्यासाठी ८० हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च मोदी सरकारकडून केला जात असल्याची माहितीही आमदार सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवालत्यांनी दिली. 

मोदी सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेमुळे गोर-गरीबांचा मोठा फायदा झाल्याचे मत नोंदवत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मोदी सरकारचे कौतुक केले असल्याचेही सर्वसामान्य नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासात या माध्यमातून त्यांनी नमूद केले.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या