Ticker

6/recent/ticker-posts

डाॅ.आंबेडकर यांच्या संकल्पनेतील एस. एस. डी.(SSD) - एक रिपब्लीकन चळवळ

डाॅ.आंबेडकर यांच्या संकल्पनेतील एस. एस. डी.(SSD) - एक रिपब्लीकन चळवळ


भारतरत्न डाॅ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारत कसा असावा हे त्यांनी चालवलेल्या संकल्पनेतुन आपल्याला स्पष्ट करता येईल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संकल्पनेतील भारत हा त्यांनी स्थापीत केलेल्या  समता सैनीक दल आणि रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या सामाजीक चळवळीतुन साध्य करायचा होता. विचार केला तर भारतामधील सामाजीक चळवळीमध्ये सहभागी झालेले नेतृत्व राजकारणात कृतीशील होते. यांची ठळक उदाहरणे म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोनच दिसून येतात या दोन उदाहरणांच्या आधारे असेही म्हणता येते कि सामाजीक चळवळ ही विध्याक्षेत्रत राजकारणचा कणा आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि दलित(अस्पृश्य) चळवळ यामधून उदारमतवाद, लोकशाही, सामाजिक न्याय, अशा आधुनिक विचारप्रणालीचे स्वतंत्र्य असे भारतीय अर्थ देखील अभिव्यक्त झाले आहेत. तर हिंदुत्व चळवळीमध्ये 'राजकारण' या क्षेत्राबद्दल आरंभी मतभिन्नता होती; परंतु कालांतराने त्या मधे बदल होऊन समाजात उत्सुकता वाढत गेलेली दिसली. त्या उलट रिपब्लीकन चळवळ ही राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतांना दिसली. दुसरीकडे सावकरनिष्ठ हिंदू परिवार मात्र राजकारणाशी जुळवून घेत असतांना दिसला. स्वातंत्रोत्तर काळात मात्र सर्वच हिंदुत्व परिवाराने राजकारणाशी संबंध प्रस्थापित केले. मागासवर्गीय समाजामधे रिपब्लीकन चळवळीचा विस्तार होण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला त्रीसुत्री आखुन दिली आहे; ती म्हणजे १.समता सैनीक दल(SSD) २.रिप्बलीकन पार्टी ऑफ इंडीया(RPI) आणि ३. भारतीय बौध्दमहा सभा.  समता सैनीक दल हे  समाजाचे नेतृत्व करेल, सामाजीक कार्य चालवेल, देशाचे राजकीय नेतृत्व कोण करेल? हे ठरवेल कारण समता सैनीक दल हे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियना (RPI) शी जोडले जाईल अशी रचनाच केलेली आहे. तर भारतीय बौध्द महासभा हे समाजातील धार्मिक कार्य बघेल, असा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. 
रिपब्लीकन चळवळ आणि राजकारण यांचे संबंध कसे असावेत हा मुख्य प्रश्न समता सैनीक दल बघेल. ही रिपब्लीकन चळवळ बळकट करण्यासाठी डाॅ.  भिमराव आंबेडकरांनी एसएसडी ची स्थापना १९२७ मधेच केली आहे. याचा संदर्भ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड १७ भाग ३, पृष्ठ ५६६ वर पहावयास मिळेल. समता सैनीक दल हे मुख्य संघटन आहे त्याचे कलम १ ते १२ दिलेली आहेत त्यामधे धेय्य, सभासदत्व, प्रशिक्षण, रचना, सभा, दैनीक वेळापत्रक, शिस्त, गणवेश, निधी , ध्वज व प्रतीज्ञा या कलमानुसार जो चालेल तोच खरी बाबासाहेबांची चळवळ टिकवु शकतो व हा रथ पुढे नेऊ शकतो, असे सुचविले आहे. परंतु आज कोणीही या कार्यक्रमानुसार वागतांना दिसत नाही. प्रत्येकांनी वेगवेगळ्या प्रकारची गट - तट निर्माण केलेली आहेत. जो तो मीच खरा हे सिध्द करतांना दिसत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे परंतु खरी कुणीच चालवीतांना दिसत नाही, त्यांच्या संकल्पनेतील भारत कुठेतरी मागे पडतांना दिसतो आहे. आता प्रश्न  राहतो  बाबासाहेबांची ही चळवळ खरी कोण चालवीतांना दिसतो? तर उत्तर स्पष्ट आहे आर.एस.एस., कारण बाबासाहेबांच्या संकल्पनेतील भारत हा एक संघ असायला हवा त्यासाठीच वरील त्रिसूत्री कार्यक्रम ही संघटना चालवतांना दिसते. यांच्या जवळ अंदाजे १० लाख प्रचारक सैनीक आहेत, की जे समाजाचे आणि धर्माचे काम आजीवन करीत आहेत. आणि त्याचेच फलित म्हणजे हे संघटन सत्तेत आलेले दिसते आहे. हे ऐकुण आश्चर्य वाटत असेल परंतु एस.एस.डी. चेच अनुकरण करून देशात एखादे संघटन सत्ता चालवीत असेल तर खरच एस.एस.डी. च्या कलमामधे किती ताकद आहे, हे स्पष्ट होते. एस.एस.डी च्या कलमानुसार जर  आपण चाललो, वागलो तर संपुर्ण भारत देशावर रिपब्लीकन राज्य सत्तेत आणण्याची ताकद आपल्याला डाॅ. आंबेडरांनी एस.एस.डी. च्या स्वरूपात दिली आहे. जर अजुनही दलीत , बहुजन आणि रिपब्लीकन समाज आजही जागृत झाला नाही तर पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था लागू होण्यास वेळ नाही. ज्यामधे शुद्र (OBC) सेवा करेल, अतिशुद्ध (SC) अस्पृश्य राहील, अवर्णनीय (ST) जंगलामुळे भटकत राहील, मुस्लिमांचा विकास तिथेच थांबलेला राहील. ढोल आणि ताशाच्या आवाजात नाचण्यापेक्षा, वाचन करून वेळीच जागृत व्हा. त्यासाठी आपल्याला समता सैनीक दल ही एक सामाजीक व रिपब्लीकन चळवळ दिली आहे, हे संघटन प्रत्तेक व्यक्तीला  प्रशिक्षीत करून राजकीय संघटनासाठी तयार करतो.  समता सैनीक दलाचे प्रशिक्षण हे १.बौद्धीक २.शारारीक ३.लष्करी अशा तीन प्रकारचे आहे.  प्रशिक्षीत सैनीक हा अतीशय चांगल्या प्रकारे राजकीय चळवळ स्थपीत करू शकतो. या माध्यमातून आपल्याला भारतचा रोख ठोक प्रभावशाली राजकीय सैनीक फक्त समता सैनीक दलामधुनच मिळू शकतो आणि  रिपब्लीकन सामाजीक चळवळ प्रभावशाली उभी करू शकतो. यासाठी प्रत्तेक घरातील १८ वर्ष पुर्ण असलेला व्यक्ती हा सैनीक होऊ शकतो. आणि  तो होतांना दिसत आहे परंतु तो फक्त एक सुरक्षा रक्षक (GUARD) चेच कम करतांना दिसत आहे. ही अतीशय लाजिरवाणी गोष्ट आहे. भरपुर असे राजकीय पार्टा         
तयार झाल्या आहेत, जसे की RPI कंसात (A ,B,C...) निर्माण झाल्या आहेत,  आणि जो तो बाबासाहेबांचे समता सैनीक दल काहीतरी आहे, हा देखावा करीत आहे. एस.एस.डी. सैनिकाला फक्त त्याचा गणवेशधारी बनवील्या जात आहे; त्याची कर्तव्य काय आहेत? रिपब्लीकन चळवळ काय आहे? राजकीय सत्ता कशी मिळवायची? या पासुन तो अलिप्त ठेवलेला दिसत आहे. 


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनीक दलाची स्थापना करून,  संपुर्ण कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यामधे एस.एस.डी. ला राजकीय पक्ष जोडल्या जाईल, राजकीय पक्षावर नियंत्रन समता सैनीक दलाचे राहील; या कार्यक्रमा प्रमाने काम केल्यास सत्ता फक्त आपलीच असेल, हे सत्य आहे परंतु हे कुणीच मानन्यास तयार नाही किंवा समाजाला त्याची जानीव होऊ द्यायची नाही, हे स्पष्ट होते. कोणताही रिपब्लीकन पक्ष हा एस.एस.डी. ला प्राधान्य देत नाही आणि याच कारणामुळे आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लीकन चळवळीचा रथ चीखलात फसलेला दिसत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारत धोक्यात आलेला दिसतो आहे.  अजुनही वेळ गेलेली नाही, आपणच पुढाकार घेऊन डाॅ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या समता सैनीक दल संघटनेला प्राधान्य द्यावे. "गांव तेथे शाखा, घर तेथे सैनीक" हा मंत्र खरा करून दाखवावा आणि संपुर्ण भारतात  सर्व राजकीय पक्षांनी, अस्पृश्य व दलीत चळवळीचे संघटक एकत्र येऊन एस.एस.डी.  च्या अधिपत्या खाली काम करावे. जी गट-तट निर्माण झालेली आहेत, त्यानी एकत्र यावे. आपसातील राजकीय मतभेद दुर करावेत म्हणजे दलीत चळवळीचा शाषणकर्ता नेता या भारत देशावर राज्य करतांना दिसेल. नाही तर तो दिवस दूर नाही की जो आपल्याला पुन्हा हजारो वर्षा आधीची शुद्र असलेली परिस्थितीचे चित्र दाखवून देईल. अजुनही वेळ गेलेली नाही आहे, दलीत,अस्पृश्य आणि बहुजन समाज हा ८५% आहे, त्याने जागृत होऊन रिपब्लीकन चळवळीला बळकट करायचे आहे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे आहे. त्यासाठी आपल्याला सर्व वैचारीक आदर्श व्यक्तींचे जसे तथागत बुध्द, सम्राट अशोक, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, छत्रपती शाहूमहाराज, पेरियार स्वामी,  आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघटन करून नाच- गाण्या ऐवजी पुस्तकांचे वाटप करावे. सर्व सामाजीक राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारतीय सविधान उद्देशपत्रीकेचे वाचन करून शपथ घ्यायला हवी. हिच डाॅ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल.
जय भिम

प्रा. प्रज्ञानंद श्रीकृष्ण थोरात
*SSD*
*अकोला*
9822664487



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या