जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाच्या मागणीला यश !
श्री विठ्ठल रखुमाई पदस्पर्शदर्शनाला गुढीपाडव्यापासून शासनाकडून मान्यता
कारंजा [ लाड ] : वाशीम जिल्ह्यातील जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ, विदर्भ लोककलावंत संघटना तथा संत नामदेव तुकाराम वारकरी पारिषद वाशिम जिल्ह्याच्या वतीने मागील पंधरवाड्यात, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे हभप संजय म कडोळे यांनी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमितजी देशमुख यांचेकडे, " आम्हा वारकऱ्यांचे मायबाप असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई पदस्पर्शदर्शन सर्वांसाठी खुले करण्याची मागणी केली होती.". सदर मागणी बाबत शासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेत येत्या चैत्र शु प्रतिपदा गुढीपाडवा दि .02/04/2022 पासून वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई पदस्पर्शदर्शन भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतलेला आहे . त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचे वातावरण असून वारकऱ्यांतर्फे संजय कडोळे यांनी शासनाचे आभार मानलेले आहे .
अकोल्यासह वाशिम जिल्ह्यात उष्णतेची तिव्र लाट ..! कारंजा [लाड]: भारतिय मौसम विभाग, मुंबईच्या आज दि.29 मार्च 2022 रोजी प्राप्त झालेल्या शासकिय बिनतारी संदेशान्वये, हवामान निरीक्षकाचे निरीक्षणानुसार, दि.29 मार्च ते दि .02 मार्च 2022 पर्यत, जिल्ह्यात व पंचक्रोशीत तापमानातील हवामानाच्या बदलानुसार, तिव्र स्वरूपाची उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, ताप येणे, अशक्तपणा असे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतोवर उन्हापासून प्रत्येकाने सतर्क राहून, स्वसंरक्षण करावे . शक्यतोवर दिवसा उन्हात घराबाहेर पडूच नये.आणि शारिरिक श्रमाची म्हणजे अंग मेहनतीची कामे टाळावीत.असे स्पष्टपणे शासनाने आवाहन केलेले असल्याची माहिती - महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम जिल्हयाला प्राप्त झाली असल्याचे,वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळवीले आहे.तसेच त्यांनी आपल्या जिल्हयातील नागरिकांना सतर्क करतांना सांगीतले की, प्रत्येक माणसाने उन्हापासून स्वतःचा बचाव करण्या करीता, शक्यतोवर पांढऱ्या रंगाचे कॉटनचे सुती कपडेच वापरावे.घराबाहेर पडतांना सन - गॉगल्स, डोक्याला पातळ उपरणे / दुपट्टे / कॅपस् वापरावी. बाहेर फिरतांना सोबत कापूरवड्या, पांढरा कांदा ठेवून त्याचा वास घेत जावे,बर्फाचे पाणी पिऊ नये.सोबत पाणी ठेवावे, उन्हातून आल्यानंतर लगेचच ढसढसा पाणी पिऊ नये, सकाळी साधे जेवण करूनच बाहेर पडावे, उपवाशी राहू नये . शक्यतो गुल्कान - डी पावडर, ओ आर एस पावडर सोबत ठेवावी . व त्याचे पाणी घ्यावे.एवढी पथ्य बाळगून उन्हाळ्याचा त्रास कमी करता येईल.
0 टिप्पण्या