Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा  जिल्हाध्यक्ष आ.रणधीर सावरकर यांनी सरकारवर तोफ डागली 

जागतिकस्तरावर उन्हाचा पारा अकोला शहर आठव्या क्रमांकावर



अकोला
जागतिकस्तरावर उन्हाचा पारा अकोला शहर आठव्या क्रमांकावर असून अकोला वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे उष्माघात कक्ष सुरु करण्यात यावा असे गेल्या महिन्याभरापासून कनिष्ठ डॉक्टरांकडून रुग्ण व नातेवाईकांना अपनास्पद वागणूक देऊन त्यांचे फोन न उचलणे, माहिती न देणे तसेच मोजकेच प्राध्यापक, सह प्राध्यापक उपस्थित राहणे, टेलिफोन इंटरकॉम असून सुद्धा ती मृता अवस्थेत असणे, अपघात कक्षात रुग्णांच्या संदर्भात दक्षता न घेणे, निर्णय न घेणे, ओपीडी मध्ये पर्यायी व्यवस्था नसणे, सिटी स्कॅन न करणे, वार्डातील रुग्णांना सिटी स्कॅन करिता उपाशी पोटी बोलविणे व स्कॅन न करता परत वार्डात पाठविणे  तसेच अनेक तक्रारी संदर्भात आज अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने अकोला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन तक्रारी त्वरित सोडा व सर्व सामान्यांना त्रास होता कामानये असे निर्देश देऊन सर्वसामान्यांना त्रास झाल्यास परिणामासाठी सज्ज राहा असा इशारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांना दिल्या.


सर्व सामन्यांच्या तक्रारी व ग्रामीण भागातील नागरिकांना होणारा त्रास, वंचित, पिडीत समाजावर होनरा अन्याय या साठी आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक अकोला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या व या साठी तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयाचे अधिकारी डॉक्टर्स जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन समस्यांचे संदर्भात निर्देश देऊन रुग्ण ही ईश्वरसेवा मानली जात आहे व मानवता धर्माचे पालन करून जात-पात-धर्मा पेक्षा पिडीताना आधार देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे त्या कर्तव्याचे पालन करून चांगली सुविधा द्यावी असे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले.  या वेळी त्यांनी उष्माघात कक्ष, अपघात कक्षातील गोंधळ, निवासी डॉक्टरांकडून फोन न उचलणे, वेळेवर न येणे, टेलिफोन इंटरकॉम असून सुद्धा ती मृता अवस्थेत असणे, अपघात कक्षात रुग्णांच्या संदर्भात दक्षता न घेणे, निर्णय न घेणे, ओपीडी मध्ये पर्यायी व्यवस्था नसणे, सिटी स्कॅन न करणे, वार्डातील रुग्णांना सिटी स्कॅन करिता उपाशी पोटी बोलविणे व स्कॅन न करता परत वार्डात पाठविणे  इत्यादी समस्या निकाली काढून तक्रार येत कामा नये असे निर्देश दिले. या वेळी जयंत मसने, माधव मानकर, डॉ मीनाक्षी गजभिये, डॉ कुसुमाकर घोरपडे, डॉ अष्टपुत्रे, डॉ सिरसाम, डॉ पवार, मोहन पारधी आदी उपस्थित होते.


हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?


भाजपा नेते आमदार सावरकर , आमदार खंडेलवाल यांचा सवाल 
अकोला
हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा  जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज  सरकारवर तोफ डागली 
हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणा-या शोभायात्रा मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा   यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज  आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. 
ते म्‍हणाले की, ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा   व इतर सणांच्या मिरवणूकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणंचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो ? असा सवाल त्‍यांनी केला.  पोलीसांनी  जमावबंदीचे आदेश  दिले .  चैत्रा मध्ये गुढीपाडवा आणि  विविध सण येतात. म्‍हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा  विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल करीत अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारकडे मागणी केली आहे तसेच या संदर्भात आज उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश अपार यांची भेट घेऊन ताबडतोब परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली यावेळी आमदार वसंत खंडेलवाल यांनी बहुसंख्य समाजाची भावना की, संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून या दोन्‍ही सणांना परवानगी देण्‍यात याव्‍यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये आम्‍ही  या मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करीत असून या उत्‍सवात जिल्ह्यात भाजपा सहभागी होईल, असेही आमदार रणधीर  सावरकर, आ. गोवर्धन शर्मा,  आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल  यांनी आज जाहीर केले.


वीट भट्टी बंद करण्याचा आदेश प्रशासन दिलाय अन्यायकारक


अकोला
वीट उत्पादकांना वीट चे हंगाम सुरू असताना वीट भट्टी बंद करण्याचा आदेश प्रशासन दिलाय अन्यायकारक असून शेतकरी वीट उत्पादक तसेच कामगार व घर निर्माण करणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होणार आहे आज वीट उत्पादक शेतकऱ्यांनी रणधीर भाऊ सावरकर यांची भेट घेऊन आपली अडचणी व प्रशासनाची अडवणूक याविषयी माहिती देऊन सर्व नियमांचे पालन करत असताना त्रासाबद्दल निवेदन देऊन  गार्‍हाणी मांडली.
आज अकोट बाळापुर चोहटा निंबा परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर यांची भेट घेऊन खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या याभागात वीट उद्योग शिवाय कोणताही उद्योग नाही सर्व शेती कोरडवाहू आहे गोड पाण्याचे स्तोत्र नाही तो ओलीत शेती नसल्यामुळे फळबाग नाही 20 टक्के माती राख तसेच उसाचे चिपाड, तर टिकाऊ वस्तू टाकून तयार करतात 30 हजार पेक्षा जास्त कामगार यामध्ये काम करत असून अनेक परिवारांचा पालन-पोषण या धंद्यामुळे होतो हंगामी धंदा असल्यामुळे जोडधदा म्हणून शेतकरी काम करतो  जाचक ची अटी अटी व पर्यावरण न्याय द्यावा अशी मागणी आमदार  सावरकर यांनी केली.

नदी नाल्यांच्या खोलीकरणाने 
जलस्रोत बाधित होऊ देऊ नका 
आमदार वसंत खंडेलवाल यांनी वेधले लक्ष 
अकोला. जल संधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाच्या अभिप्रायात जिल्ह्यातील नदी, नाले, तळे यांची खोली नियमानुसार ठेवल्यास भविष्यात पूर येणार नाही. तसेच, नदी, नाल्यांचा आणि जमिनीचा जलस्तर वाढेल या महत्वाच्या विषयाकडे आमदार वसंत खंडेलवाल यांनी संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले आहे.
जिल्ह्याच्या जलस्रोताला बाधा होणार नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. तसेच भविष्यातील समस्यांचा विचार करून नियोजन व्हावे असे निर्देश आ. वसंत खंडेलवाल यांनी प्रशासनाला दिले आहेत. नियम व अटींच्या अधिन राहून यासंदर्भातील कामे होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 
अकोला जिल्ह्यातील गावांमधील पाण्याची समस्या दूर होण्याच्या दृष्टीने कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उपरोक्त विवरणात नमूद केल्यानुसार तसेच कुरणखेड व सिसा येथील नदीचे खोलीकरण, रुंदीकरणासाठी 25 हजार ब्रासची मान्यता दिली आहे. त्यासाठी नियम व अटी घालून दिल्या आहेत. जलसंधारणच्या कामातून रस्त्याच्या कामासाठी किती गौण खनिजाचा वापर करण्यात आला. या बाबत उपयोगिता प्रमाणपत्र कार्यकारी अभियंत्यांना सादर करणे बंधनकारक राहील. तलावाच्या बाजूला वन विभागाची जमीन असल्यास वन्य जीव प्राण्यांचा वावर असल्यास तलावाच्या चोहीबाजूने चेनलिंक फेंसिंग करून घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पार पाडावी तसेच या प्रक्रियेमध्ये उत्खनन करताना वाळू उपलब्ध झाल्यास वाळूचे उत्खनन किंवा वाहतूक करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. 
जिल्हाधिका-यांनी काढला आदेश 
आमदार वसंत खंडेलवाल यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी रस्ता निर्मितीच्या कामासाठी नदी, नाले, तळे खोलीकरण हे नियमानुसार करावे असे निर्देश कंत्राटदार कंपन्यांना दिले आहेत. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांची परवानगी घेऊनच कंत्राटदाराने खोलीकरण करावे. खोदकाम हे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच करावे. गौण खनिज राष्ट्रीय महामार्गा व्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरता येणार नाही, असे आढळल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी 25 मार्च रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या मार्फत दिला आहे. 



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या