Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधीजींच्या विचारांची शलाका पुढे नेण्याची गरज-चंद्रकांत चौधरी

महात्मा गांधीजींच्या विचारांची शलाका पुढे नेण्याची गरज-चंद्रकांत चौधरी


सर्वोदय जल संवाद पदयात्रेचा समारोप
——————————————
अकोला—सत्य,अहिंसा,अस्तेय,अस्वाद,अपरिग्रह,अभय,शरीरश्रम,ब्रम्हचर्य,स्वदेशी,अस्पृश्यता निवारण,सर्व-धर्म समभाव या महात्मा गांधीजींच्या विचाराची शलाका पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केले.
अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे जल संवाद पदयात्रा समारोपप्रसंगी बोलत होते.महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास झांबरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड,वसंतराव केदार,सुखदेवराव मोडक,भाई प्रदिप देशमुख यांच्या नेतृत्वात गांधीसागर(नेरधामणा) येथुन बॅरेज चे दर्शन घेवुन गांधीग्राम पंचक्रोशीत जलजागृती,पाणी बचतीचा संदेश देत जल संवाद पदयात्रा काढण्यात आली.धामणा,निराट,वैराट,गोपाळखेड,गांधीग्राम येथे बालसभा व शेतकरी,ग्रामस्थांशी संवाद साधत पूर्णा घाटावर आदरांजली सभा संपन्न झाली.         


शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी या पदयात्रे सहभागी होवुन जलसंवाद यात्रेला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी,शिक्षक,ग्रामस्थांना अभ्यासिका उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांनी पाणी,माती वाचवा,शेतकरी वाचवा,माणसातली माणुसकी जपा,दुर्बलांच्या पाठीशी उभे राहा हीच खरी बापूजींना श्रद्धांजली ठरेल असे भावोद् गार काढले. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास झांबरे व सर्व शिक्षकांनी समारोपीय समारंभाचे संयोजन केले.विद्यालय प्रांगणातील पूज्य महात्मा गांधी स्मारकावर पुष्पमाला अर्पण करुन पूर्णा घाटापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. पूर्णा नदीवर गीताई प्रार्थना,रामधुन व गंगापूजन करुन महात्मा गांधीजींच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.उपप्राचार्य धनंजय पटोकार,पर्यवेक्षक राणे, अकोला जिल्हा सेवा समितीचे महादेवराव हुरपडे, सौ.सुष्मा ठाकरे सरपंच गांधीग्राम,सौ.ज्योती मोडक सरपंच गोपाळखेड,सौ.सविता गायकवाड सरपंच निंभोरा ,माजी जि.प.सदस्य सुरेश फाळके,राजेंद्र पाटील हलवणे,वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थाध्यक्ष डाॅ.गोवर्धनदादा खवले,सचिव डाॅ.काशीनाथ दाते,सर्वोदय मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे,सचिव डाॅ.मिलींद निवाणे,विठ्ठलराव हिवरे,पत्रकार संजय मांजरे,हिम्मतराव गावंडे,पांडुरंग बेदरकर,महाराष्ट्र ग्रामदान मंडळ सदस्य महेश आढे,विजय प्रदिप देशमुख,मोहन भांबेरे,गोपाळखेड केंद्रप्रमुख साहेबराव पातोंड,मुख्याध्यापक नामदेवराव फाले,डाॅ.रविंद्र भास्कर,ग्रा.प.सदस्य शरद ठाकरे,रविंद्र देशमुख,ऋषीकेश अढाऊ,संदिप वानखडे सरपंच वल्लभनगर,वसंतराव गावंडे,दयाराम गायकवाड,पुरुषोत्तम वानखडे,अमोल परनाटे,बाळासाहेब इंगळे,सुभाष माणिकलाल फुरसुले,पंडीत चौधरी,सुभाष बायस्कार,श्रीराम प्रभे,आत्माराम जाधव,विवेक नहाटे,राऊत सर यांचेसह पंचक्रोशीतलग्रामस्थ,युवक,विद्यार्थी,शिक्षक,बचतगटाच्या महिला व सर्वोदयी कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते .सूत्रसंचालन डोंगर सर यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा म्हैसने यांनी केले.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या