महात्मा गांधीजींच्या विचारानेच राष्ट्राची एकात्मता अखंडीत आहे—प्रा.राजाभाऊ देशमुख————————————————
अकोला—महात्मा गांधीजींच्या विचारानेच भारतासारख्या विविधतेने नटलेल्या राष्ट्राची एकात्मता अखंडीत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते प्रा. राजाभाऊ देशमुख यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने गांधी जवाहर बागेत आयोजित सूत कताई यज्ञाचे समारोपप्रसंगी बोलत होते.सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार,अकोला जिल्हा सेवा समितीचे महादेवराव हुरपडे,वसंतराव केदार,वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष डाॅ.गोवर्धनदादा खवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वराज्याचे सुराज्य करायचा महात्मा गांधीजींचा संकल्प होता.ते स्वप्न साकारण्यासाठी गांधीजींच्या सत्य,अहिंसा तत्वाचा अवलंब करण्याचे आवाहन ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांनी केले.
महात्मा गांधींना बदनाम करण्याचे षडयंत्र सोशल मिडीयातुन होत आहे.मात्र कुणाच्या हेटाळणीने गांधी विचार संपणार नाहीत.उलट अवघ्या जगात अहिंसेचा पुजारी म्हणुन गांधीजींना अभिवादन केले जाते असे प्रतिपादन गोवर्धनदादा खवले यांनी केले. चरख्यावर सूतकताई करतांना गांधीजींनी दिलेली ही प्रतिके जीवनभर प्रेरणा देत असल्याचे चिंतन दिलीप शोभराज साधवानी यांनी व्यक्त केले.
अकोला जिल्हा सेवा समितीचे महादेवराव हुरपडे यांनी गांधीजींची आवडती भजने सादर केली.
महात्मा गांधीजींचे साहित्य व विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जिल्हा सर्वोदय मंडळ निरंतर चरखा प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती समारोपीय भाषणातुनसर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी दिली.
आत्मशुद्धीसाठी सर्वोदयी कार्यकर्त्यांनी आज उपवास करुन चरख्यावर सूतकताई केली.कोरोना नियमाचे पालन करीत सर्वोदयी कार्यकर्त्यांनी घर,परिसर,गावाची साफसफाई केली.खादी वस्त्र स्वावलंबन,ग्रामसफाई व निसर्गोपचाराचा संकल्प केला.ज्येष्ठ सर्वोदयी वसंतराव केदार,आत्माराम शेळके,जयकृष्ण वाकोडे अकोट यांनी कार्यकर्त्यांना सूतकताईचे प्रशिक्षण दिले.अनिल मावळे,शंकरराव सरप गुरुजी वाडेगांव,किशोरभाई मिश्रा रोहणा,प्रा.डाॅ.संजय तिडके ,अनिल श्रीकृष्ण वाघमारे,सविता शेळके,रेखाताई वाकडे,डाॅ.किरण वाघमारे,रोहित तारकस,दिलीप शोभराज साधवानी यांनी सूत कताई यज्ञात सक्रीय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन डाॅ.मिलींद निवाणे यांनी केले.
सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
माजी मंत्री खान मो.अजहर हुसेन,काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर,डाॅ.किशोर ढोणे,विजय भगवंतराव कौसल,विलास वखरे,गजानन डिवरे पाटील,प्रा.डाॅ.सत्यनारायण बाहेती,जावेदखान,राम शेगोकार,धनंजय मिश्रा,साजीदखान पठाण,रहेमानबाबू ,महानगर काँग्रेस चे अध्यक्ष डाॅ.प्रशांत वानखडे,अँड.महेश गणगणे,सौ.अनुजा शाह,सौ.पुष्पा देशमुख,कीर्ती देशमुख,दत्तात्रय खताळ,जिल्हा स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी,देविदास नेमाडे,के.एम.बापू देशमुख,प्रा.दिनकर पाटील,कपिल रावदेव,अशोक रामटेके,अँड.लक्ष्मीकांत अंबारखाने,विनायक बोराळे,मोहन आमले,सोमेश डिगे,विनोद नालट,अक्षय झटाले भाई रजनीकांत यांचेसह सर्वोदयी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
0 टिप्पण्या