पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची ई-श्रम कार्ड योजना
अकोला
असंघटित कामगारांना विविध योजनेचा समाजातील सर्व घटकांना लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ई-श्रम कार्ड योजना केली असून या योजनेचा लाभ पीडित वंचित तसेच माग मध्यमवर्गीय समाजाला तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना मिळावी यासाठी श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने त्यांना मोफत कार्ड उपलब्ध करून देण्याचा व त्यांची नोंदणी करण्याचा काम अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन अनुप धोत्रे यांनी केले.
आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने श्री रामनवमी शोभायात्रा समितीने स्थानिक परशुराम चौक खोलेश्वर येथे शिबिराचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विलास अनासने होते. तर महापौर अर्चना ताई मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी, ब्रिजमोहन चीतलांगे, अनिल मानधने, हरीश आलम चंदानी, अश्विनी हातवळणे, चंदा शर्मा सारिका जयस्वाल सुमन ताई गावंडे उषाताई विरक कपिल राजदेव, महादेव हुडपुडे, अजय शर्मा, जानवी डोंगरे संतोष पांडे संजय गोडफोडे गिरीराज तिवारी, विजय इंगळे, तेउमेश गुजर अमोल गीते रमेश करियार, अमोल मोहाकार संतोष पांडे, मनोज साहू राम ठाकूर पुष्पा वानखेडे आदी मंचावर विराजमान होते,
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने कामगारांना आजार शैक्षणिक, वेगवेगळ्या कामासाठी मदत देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करून सर्व सामाजिक क्षेत्रात सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे. रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने मातृ शक्तींचा सबलीकरणाचा काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. श्री रामनवमी शोभायात्रा समिती जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समिती सातत्याने 365 दिवस अध्यात्म धार्मिक व मदतीचा कार्य करून सामाजिक दायित्व करत असल्याचे प्रतिपादन महापौर अर्चनाताई मसणे यांनी यावेळी सांगितले
व आमदार गोवर्धन शर्मा व त्यांची चमू सातत्याने अकोल्यात समाजाला व विदर्भात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून दिशादर्शक कार्य करीत असल्याचे सांगितले.
यावेळी राम ठाकूर उमेश तिवारी, बाळकृष्ण बिडवई चंदा ठाकूर, संतोष डोंगरे, भूषण इंदुरी या, मनीषा भुसारी मनीषा सावजी कल्पना अडचुले पद्माअडचुले संतोषी शर्मा मालती रणपिसे, सारिका देशमुख, दुर्गा जोशी सोनाल शर्मा रेवती शर्मा, सोनल अगरवाल सुमन अग्रवाल, टोलु जयस्वाल,साधना येवलेनिशा कडीहरीश जैन ऋषिकेश श्रीवास्तव मिहीर मलकान प्रेम प्रेम टाले रोहित लगड अमोल बोरकर जय मलकान गौरव चव्हाण, बन्सी चव्हाण, योगेश जयराज निखिल ठाकूर कृष्णा ठाकूर पांडे महेंद्र राजपूत, हरीश शहा , चेतन गुजर, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी प्रास्ताविक गिरीराज तिवारी तर आभार प्रदर्शन संजय गोडफोडे यांनी केले.
0 टिप्पण्या