Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्ह्यावर अन्याय का? असा सवाल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर

अकोला जिल्ह्यावर अन्याय का? असा सवाल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर


अकोला
अकोला जिल्हा महाराष्ट्रात नाही काय,?शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस च्या आघाडी शासनाने महाराष्ट्र राज्यातून  अकोला जिल्हाचे अस्तित्व काढून टाकून समस्त जिल्हा वासीयांवर शासनाने केलेला अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही. अकोला जिल्ह्यावर अन्याय का? असा सवाल आमदार व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित करून मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत 2021 22 च्या वर्षामध्ये  नियोजन विभागाने अकोला जिल्ह्यावर अन्याय का केला याविरोधात शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर आल्यास याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची असेल मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्या अंतरराष्ट्रीय राज्यस्तरावरच्या व वेगवेगळे ज्ञान सांगणारे लोकप्रतिनिधी महा विकास आघाडीला या अन्याय विरोधात जाब विचारणार का? असा सवाल आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग रोहयो विभागाने शासन निर्णय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार दोन हजार बावीस प्रकरण झिरो 2 झिरो सहा निधीअंतर्गत वाटप करताना अकोला जिल्ह्यावर अन्याय केला असून जिल्ह्यातील  एकही रस्त्याचे काम मातोश्री ग्राम समृद्धी योजना अंतर्गत घेण्यात आलेले नाही. तसेच विदर्भावर निधी देताना मोठ्या प्रमाणावर अन्याय करण्यात आला आहे. तुटपुंजी निधी देऊ तुटपुंजी विदर्भाच्या नागरिकांवर अन्याय करण्याचा काम शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केला आहे.यासंदर्भात अकोला जिल्हा भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी तीव्र शब्दात सरकार चा निषेध केला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपयोगी पडणारा रस्ता का उपलब्ध करून दिला नाही यासाठी निधी का देण्यात आला नाही? याचा जाब शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांना विचारण्यात येणाऱ्या असून विदर्भाच्या शेतकऱ्यांवर नेहमी अन्याय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी गेल्या दोन वर्षापासून करत आहे हे वारंवार कृतीने सिद्ध होत आहे.


 हा प्रकार निंदनीय असून महाराष्ट्र शासनाने त्वरित विदर्भाच्या शेतकऱ्यांची माफी मागावी व अकोला जिल्ह्याला न्याय द्यावा व अकोला जिल्ह्याला निधी का देण्यात आला नाही यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवला नाही काय?. प्रतिनिधी पाठवलेला प्रस्ताव संदर्भात कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल आमदार  सावरकर यांनी उपस्थित करूनग्रामर ग्रामस्थांवर अन्याय करण्याच्या मागे हेतू काय यामध्ये मागील झारी चा  शुक्राचार्य कोण,,? हे सरकारने जाहीर करावे. विदर्भावर अन्याय का विदर्भात नागरिक शेतकरी राहत नाही काय रस्त्यांची गरज नाही काय असा सवाल आमदार सावरकर यांनी उपस्थित केला आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या