नद्या नाल्यावर पुलवजा बंधारे बांधा—अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीची मागणी
—————————————————————
अकोला—गावा गावांना जोडणार्या रस्त्यावर लागणार्या नद्या- नाल्यावर साधे रपटे किंवा नुसते पुल टाकण्याऐवजी पुलवजा बंधारे (ब्रीज कम डॅम) बांधण्याची मागणी अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार,उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे,सचिव भाई प्रदिप देशमुख ,प्रसिद्धी प्रमुख बबनराव कानकिरड,काटीपाटी बॅरेजचे अध्यक्ष किशोरभाई मिश्रा यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
खारपानपट्ट्यातील पाण्याची भीषणता लक्षात घेऊन अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीने कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला च्या सहकार्याने जलजागृतीसाठी वारंवार चिंतन बैठका घेऊन जिल्ह्यातील प्रलंबीत असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी रेटुन धरली आहे. केवळ सिंचन प्रकल्प पूर्ण करुन तहान भागणार नाही तर सर्व नद्या नाले जलसंमृद्ध करण्यासाठी पुलवजा बंधारे बांधल्यास पाणलोट क्षेत्र जलमय होण्यासोबतच ग्रामस्थांच्या जाण्यायेण्याची,गुराढोरांसाठी,पिण्यासाठी,शेतीसिंचनाची सुविधा होईल.यासाठी समिती शासन दरबारी आग्रह धरणार आहे.भूजलभरण,जलसंवर्धन,वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रमाचा समितीने संकल्प केला आहे.
————————————————निंभोरा येथील लोणार नदीवरील बंधार्याचे काम प्रगतीपथावर-महादेवराव भुईभार
अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीने जिल्ह्यातील प्रलंबीत सिंचनप्रकल्पस्थळी नेरधामणा,काटीपाटी ,केळीवेळी,निंभोरा येथे भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला.निंभोरा येथील लोणार नदीवरील ब्रीज कम डॅम चे काम प्रगतीपथावर असल्याचे पाहुन महादेवराव भुईभार यांनी ग्रामस्थांसोबत आनंद व्यक्त केला.
या पुलवजा बंधार्याने लोकांना शेतात जाणे सोईचे होईल,पंचक्रोशीत भूजलभरण होईल सोबत शेती सिंचनक्षेत्रात वाढ होणार आहे.अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे सचिव भाई प्रदिप देशमुख,बबनराव कानकिरड,काटीपाटी बॅरेज समितीचे अध्यक्ष किशोरभाई मिश्रा,गजानन ताथोड,नितीन देशमुख,शांताराम भुईभार,शशिकांत आवारे,केशव ताठे,नितीन ताथोड,सुरेश ताठे,केशव गोंडचवर,बळीराम सूर्यवंशी यांचेसह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
0 टिप्पण्या