अकोल्यातील कर्फ्यु दोन दिवसांनी वाढवला : कर्फ्यु व जमावबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत कायम, उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले नवीन आदेश.
अकोला दि १८ : अमरावती जिल्ह्यातील झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अश्यातच त्याचे पडसाद अकोल्यात उमटू नये या करिता अकोला उपविभागीय दंडाधिकारी डॉ.निलेश अपार यांनी अकोल्यात १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर अशी २ दिवसांची संचारबंदी व जमावबंदी जाहीर केली होती.
यामध्ये सकाळी ६ वाजेपासून तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश तर सायंकाळी ७ वाजे पासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. आता पुन्हा जमावबंदी व संचारबंदी नव्याने प्रस्तावित करण्यात आली असून आणखी २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.नव्या आदेशानुसार ही जमावबंदी आणि संचारबंदी २१ नोव्हेंबर च्या सकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.
यासोबतच सदर आदेशात आणखी काही बाबी नमूद केल्या आहे त्या खालीलप्रमाणे-
संचारबंदी कालावधीत आरोग्य विषयक सर्व सेवा सुरू राहतील अत्यावश्यक कामे असलेली सरकारी कार्यालय सुरू राहतील असे सुद्धा आदेशात नमूद केले आहे.
कुठल्याही प्रकारचे धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य करता येणार नाही.
लसीकरण पूर्वीप्रमाणे सुरू राहतील
विधान परिषद निवडणूक प्रचारसभेची निवडणूक निर्णय अधिकारी यांना माहिती देणे बंधनकारक राहील.
0 टिप्पण्या