Ticker

6/recent/ticker-posts

समाज माध्यमातून फिरत असलेले कोरोना कडक निर्बंध बाबतचे बातमीचे कात्रण चुकीचेच; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये*


*समाज माध्यमातून फिरत असलेले कोरोना कडक निर्बंध बाबतचे बातमीचे कात्रण चुकीचेच; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये*


अकोला दि २९ : करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने रुग्ण उपचार संबंधाने राज्य सरकार कडून युध्द पात़ळीवर याबाबत उपाय योजना केल्या जात आहे.मात्र दि ३ ऑगस्ट रोजी ११ जिल्हे वगळता उर्वरित २५ जिल्ह्यातील हटविण्यात आलेल्या कडक निर्बंधात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
यामधे अकोला जिल्ह्याचा समावेश असुन, समाज माध्यमांवर काल पासुन व्हायरल होत असलेली बातमी खोडसाळ आहे. विशेष म्हणचे ते वृत्तपत्राचे कात्रण ऑगस्ट महिन्यापुर्वीचे आहे. राज्यशासनाने नविन कुठलाही आदेश जारी केला नाही आणि सप्टेंबर महिन्याच्या अनुषंगाने ही जिल्हा पातळीवर ३१ ऑगस्टला जिल्हाधिकारी बैठक घेवुन ‘जो काय निर्णय घेणार’ त्यानंतरच आदेश जारी होईल. समाजमाघ्यमातील ‘ती’ बातमी निराधार असल्याने कोणीही विश्वास ठेवू नये.सध्या स्थितीत, सर्व व्यवसायीक प्रतिष्ठानाना दिलेला अवधि ‘जैसे थे’ आहे.केरळ व महाराष्ट्रात करोना रुग्ण संख्या वाढत असली तरी महाराष्ट्रातील परिस्थिति पुर्णपणे नियंत्रणात आहे. कडक निर्बंध शिथिल करताना ३ ऑगस्ट रोजी ज्या ११ जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले होते.यापैकी पुणे व कोल्हापुर येथील निर्बंध ही शिथिल केले आहे.मात्र केंद्र सरकारने आगामी का़ळात सण-उत्सवाने होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाय योजना करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहे.या बाबत मुख्यंमत्री सर्व संबंधितांची बैठक घेवून नविन निर्देश देवू शकता पण तो पर्यंत कुठलाही बदल शक्य नाही.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या