शेतकरी आत्महत्या थांबवा काळी राखी बांधून सरकारला हाक!
वाशिम
राज्यासह विदर्भात दररोज २-३ शेतकरी आत्महत्या होत आहेत तरी महायुती सरकार ला कर्जबाजारी शेतकऱ्याची आठवण येत नाही.आज शेंदुरजना अढाव ता.मानोरा जि.वाशिम प्रहार जनशक्ती पक्षाच्या महीला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधानांना काळी राखी बांधून हृदय हेलावून टाकणारा संदेश दिला आधी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पण आता आमच्या शेतकरी बांधवांना,भावांना वाचविण्यासाठी कर्जमाफी हवीच व सातबारा कोरा पाहीजेत. यावेळी तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या महीला कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या