माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांचा जन्मदिनी होणार समाज उपयोगी कार्यक्रम
अकोला
विदर्भाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणारे शेतकरी, कामगार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून कार्य करणारे अजातशत्रू माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांचा जन्मदिनी जिल्ह्यात सामाजिक, समर्पण, समरसता दायित्व दिवस म्हणून साजरा होणार असून या निमित्ताने समाज उपयोगी कार्यक्रम रक्तदान, साफसफाई, मातृशक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम होणार असून या निमित्ताने जिल्हाभर 250 ठिकाणी कार्यक्रम होणार असून भाजपा महिला आघाडी अल्पसंख्यांक आघाडी, शेतकरी आघाडी ,युवा मोर्चा, ओबीसी,शेतकरी ,अनु जाती,अनु.जमातीचे वतीने वेगवेगळे कार्यक्रम होणार असून समाजाला समर्पण दिवस म्हणून या दिवसाला महत्त्व असून सातत्याने जनतेची सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची परंपरा कायम ठेवण्यासाठी माजी खासदार व केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांचे जन्मदिन निमित्त धार्मिक आदिवासी क्षेत्र अश्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव मानकर यांनी दिली.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश फुंडकर, खा. अनुप धोत्रे आ. प्रकाश भारसाकळे, आ.वसंत खंडेलवाल ,आ. हरीश पिंपळे, किशोर पाटील, तेजराव थोरात,जयंत मसणे, विजय अग्रवाल, संजय गोट फोडे, देवाशिष काकड, रमेश अल्करी सुमनताई गावंडे, वैशाली निकम, चंदा शर्मा मनीराम ताले, उमेश पवार, श्रीकृष्ण मोरखडे,रवींद्र गावंडे, शे. शेरुद्दिन,आनंद पुंडे , भिकाजी धोत्रे, राजेश रावणकर, गजानन उंबरकर, देवेंद्र देवर डॉ.अमित कावरे, भूषण कोकाटे, रितेश सबाजकर संजय इंगळे, बंटी महाराज, अंबादास हिंगे ,हरीश टावरी निलेश निनोरे, संतोष पांडे, गणेश अंधारे, रमेश करिहार,संदीप गावंडे, दिलीप मिश्रा, संतोष शिवरकर, पवन महल्ले, अंबादास उमाळे, अनिल गावंडे,राजेश बेले ,प्रशांत अवचार,गणेश तायडे,अमोल साबळे,किशोर कुचके,विपुल घोगरे,आदी चे नेतृत्वात कार्यक्रम होणार आहेत.
अकोल्यात जीएसटी विभागातर्फे शोध मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये पान मसाल्याच्या दुकानांना विशेष भेट देऊन तेथे तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी संबंधित दुकान चालक नियमितपणे व सक्षमपणे जीएसटी भरत आहेत की नाही याची चौकशी झाल्यामुळे इतर व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. मात्र ही नियमित तपासणी असल्याचे सांगीतले आहे. जीएसटी विभागाने किराणा मार्केट, अलंकार मार्केट आणि भाजी मार्केटमधील गोदामांसह दुकानांची तपासणी केली. औरंगाबाद आणि मुंबई अधिकारी येथील जीएसटी विभागाने कोणतीही पूर्व माहिती न देता हा छापा टाकला आहे. या काळात या ठिकाणी जीएसटी चोरी झाली आहे का, याचा तपास करण्यात आला. ज्यामध्ये पान मसाला सुपारीची आदी दुकानांचा समावेश होता.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या