जोशी-पाटणी गुरू शिष्यांचा एकाच दिवशी मृत्यु
आज पहाटे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यासोबत कारंजा विधानसभा मतदार संघाचे सदस्य राजेद्र सूखानंद पाटणी यांचे दिर्घ आजाराने निधन झाल्याने त्यांच्या चाहत्यात शोककळा पसरली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांचे नाते गुरु शिष्याचे.आमदार पाटणी यांचा विधीमंडळ प्रवेश माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढाकार घेतल्याने झाला असल्याने राजेंद्र पाटणी मनोहर जोशींना गुरु मानायचे.
वाशीम शहरांतील जैन धर्मातील पाटणी कुटुंब अल्पसंख्याक समाजातील मारवाडी जातीचे मुळ व्यापारी. त्यांचा कुठलाही राजकीय पिंड नव्हता.तसेच अल्पसंख्यांक समाजातील असल्याने धनाढ्य कुटुंबातील असूनही राजकारणात येण्याची सुतराम शक्यता नव्हती.
१९९६ लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या काॅग्रेस कडुन राज्याचे मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना तिकीट जाहीर झाल्याने.वाशीम लोकसभा मतदार संघात मातब्बर सुधाकराव यांच्या विरूध्द कुणाला उभे करायचे हा मोठा प्रश्न युतीच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान होते.अश्यात देशाचे माजी निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांच्या सह पुंडलीकरराव गवळी यांचे सह अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव गावंडे सह राज्यमंत्री के.ना.पाटील उपाख्य बाबासाहेब धाबेकर यांचे देखील नाव चर्चेत होते.
निवडणूक आयूक्त टि.एन.शेषन यांनी निवडणूक प्रक्रीयेत आचार संहिता लागू केल्याने निवडणूक प्रक्रियेत एक नवा आयाम आला होता .त्यामुळे देशभरात टि.एन.शेषन यांच्या विषयी प्रंचड आकर्षण होते.त्यातच वृत्तपत्रात शिवसेनेकडून माजी निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे वाशीम लोकसभा मतदार संघातील जनतेमध्ये प्रंचड आकर्षण होते.अश्यातच लोकसभेच्यात उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची जाहीर सभा कारंजा शहरातील विघाभारती महाविद्यालया समोरील प्रांगणात झाली.
राज्याचे मुख्यमंत्र्यांची सभा शहरात असल्याने आम्ही कि.न. महाविघालयातील मित्रांचा एक घोळका सभेत मुख्यमंत्र्यांचे विचार ऐकण्यासाठी विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रांगणात जमा झाला होता.सभा सुरू होताच आगे बडो,विजय असो अश्या घोषणा देणे सुरू झाले आम्ही कि.न.महाविघालयातील मित्रांनी we want sheshan अश्या घोषणा दिल्या तर शिवसेनेचे निष्ठावान मुस्लिम शिवसैनिक तथा पालकमंत्री गुलाबराव गावंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आदिम भाई यांनी गुलाबराव गावंडे तुम आगे बडो हम तुम्हाला साथ है ! अशी घोषणा दिली.
मुख्यमंत्री मनोहर जोशी सभेला संबोधित असत असतांना नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले एक मागणी We Want sheshan अशी आली बरोबर आहे.शेषन यांना इंग्रजीच कळतं.त्यामुळे इंग्रजीतून केलेली मागणी योग्यच आहे पण राज्यातील संपुर्ण जनतेला इंग्रजी येत नसल्याने समस्यांची जाणीव इंग्रजी बोलणा-या अश्या समाजातील विकासाकरीता मराठी भाषा बोलणा-यासच उमेदवारी द्यावी लागेल अशी खिल्ली. त्यांनी आमच्या मागणीची उडविली.
दुसरी मागणी गुलाबराव गावंडे यांची होती त्यावर मुख्यमंत्री यांनी दुसरी मागणी आली गुलाबराव गावंडे यांची होती प्रेषकातून.कुणीतरी गुलाबराव गावंडे तुम आगे बडो ! अशी होती त्यावेळी गुलाबराव पुढे गेली ही हळुच त्यांचा सदरा ओढत मागे ओढले नेता पडू नये. म्हणून काळजी घ्यावी लागते अशी कोपर कळी त्यांनी आजिमभाई यांच्या मागणीवर लावली..
पुंडलीकराव गवळी यांना तिकीट निश्चित झाले ते निवडुनही आले. पुंडलीकराव गवळी यांना निवडून आणण्यासाठी राजेंद्र पाटणी यांनी अथक परिश्रम घेतले. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री वाशीमला येत तेव्हा त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था राजेंद्र पाटणी करत असत.पुढे अकोला-बुलढाणा विधान परिषद मतदार संघाची निवडणुक लागली त्यातुन राजेद्र पाटणी यांना उमेदवारी देण्यात आली.अकोला-बुलढाणा विधान परिषद मतदार संघात काॅंग्रेसचे् तत्कालीन आमदार बबनराव चौधरी यांची तिकीट कापुन खासदार अनंतराव देशमुख यांना देण्यात आली.या मतदार संघात काॅंग्रेसचे् बहूमत परंतू राजकीय पिंड नसलेले राजकारणात नवखे असलेल्या राजेंद्र पाटणी यांनी सहज विजय मिळवला. पक्षाने आदेश दिल्याने राजेद्र पाटणी यांनी कारंजा विधान सभा मतदार संघातून विधानसभेची तयारी चालू केली.त्यांनी पक्ष प्रमुखांना वचन दिले होते की अकोला-बुलाढाणा-वाशीम विधान परिषद मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला नाही तर मातोश्रीवर तोंड देखील दाखवणार नाही.त्याप्रमाणे त्यांनी या मतदार संघातून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरीया यांना निवडून वचनांची पूर्तता केली.
कारंजा मतदार संघात विधान सभेची तयारी करता असतांना शिवसेनेचे तत्कालीन शहर प्रमुख राजेश राय,गोपाल पाटील येवतेकर हे माझे परममित्र.पत्रकार संजय भेंडे,राजीव भेंडेआणी माझी शिवसेनेला अभ्यासू नेता लाभला असल्याने आपण त्यांच्या सोबत काम करण्यासाठी विनंती करत होते.तर आम्ही त्यांना नकार देत होते.अनेक दिवसांच्या प्रयत्ना नंतर एके दिवशी गोपाल पाटील येवतकर यांनी शिवाय नमः मठात कार्यक्रमात आमची भेट घडवून आणली.मग पुढे आम्ही त्यांच्या सोबत खेड्या पिढ्यांना भेट देऊ लागलो...मला म्हणायचे तु बंजारा आहेस तर मला गोरमाटी शिकव.
कारंजा मतदार संघात पुर्वी मुर्तिजापूर तालुक्याचा माना सर्कल भाग होता तिथे आम्ही भेटी देऊ लागलो.आमदार राजेंद्र पाटणी हे वाशीमवरून भल्या पहाटे कारंजा येत त्यावेळी मी झोपेतून उठलेला देखील नसे.कारंजाला येताना ते सकाळी जैन मंदिरातून भल्या पहाटे पुजा करून व्यायाम करून यायचे ते सायंकाळी सहा वाजेपुर्वी जेवून करायचे सहा वाजेपुर्वी जेवून झाले नाही तर ते उपाशीच झोपायचे बाहेर गाने किंवा पाणी ही पित नसतं जैन धर्माचे काटेकोर पालन करत अश्या मानसाला आजार होईल अशी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती.नोकरी निमित्त मुंबई स्थायीक झाल्या नंतर त्यांच्याशी संपर्क कमी झाला.एके दिवशी कळाले की त्यांना मुत्रपिंडाचा आजार जडला आहे,मला धक्काच बसला एवढा व्यायाम करणार,आहार यांच्यावर लक्ष देणारा मानसाला मुत्रपिंडाचा आजार जडू शकतो यावर माझा विश्वासच बसेना काळाचा महिमा काळच जाणे. आज सकाळी मनोहर जोशी-राजेद्र पाटणी या गुरु शिष्याची निधन वार्ता एकुण मन सुन्न झाले.या गुरु शिष्याला माझी भावपुर्ण श्रध्दांजली . . !
रितेश हरीष पवार
मो ९६५३२३६६७२
वसंत विचारधारा मंच महाराष्ट्र
( संकलन : प्रज्ञानंदथोरात)
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या