गुन्हेगारी वृत्तीला आळा बसण्यासाठी अहमदनगरच्या धरतीवर अकोल्यात कॅमेरे लावावेत- आ.सावरकर
अकोला सीसीटीव्ही यंत्रणा अहमदनगरच्या धरतीवर उभारणी करून गुन्हेगारीवर नियंत्रण करून भविष्यात निष्पक विद्यार्थ्यांची हत्या होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने सक्षम यंत्रणा उभी करा दामिनी पथक उभारणी करा, असमाजिक तत्व तसेच व्याज राजखोरांवर तक गुन्हे दाखल करा, मुला मुलींची छळकारी करणारे कायमचा बंदोबस्त करा या दृष्टीने पोलीस यंत्रणा लक्ष द्यावे घटनेचा राजकारण करण्यापेक्षा समाधान करून भविष्यात अशा घटना होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा नियोजन बैठकीत जिल्हा पालकमंत्री कडून अहमदनगरच्या धरतीवर कॅमेरे लावून शहरातील ज्या भागांमध्ये अशा घटना घडतात त्या भागात विशेषता ट्युशन परिसर या परिसरात कॅमेरे लावण्यात यावे तसेच कोचिंग क्लास यांनी सुद्धा आपल्या परिसरात कॅमेरे लावण्यात लावावे यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली.
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी गंभीरपणे दखल घेऊन सरकार याला निधी उपलब्ध करून देऊन गुन्हेगारीवर वचक लावण्यासाठी कटिबद्ध असून झालेली घटना दुर्दैवी आहे परंतु शहरातील चांगल्या वातावरणाला दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी गुन्हेगारांना अटक झाल्यावर सुद्धा तसेच शासन भाजपा शिवसेना राष्ट्रवादी सरकार यासंदर्भात यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील गंभीर असून निधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपलब्ध करून गुन्हेगारीवर वचन करण्यासाठी तसेच असामाजिक तत्त्वावर कारवाई करण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला योग्य ते आदेश निर्णय दिला आहे व भविष्यात असा प्रकार होणार नाही यासाठी दक्षता घेण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत परंतु महायुतीच्या ने द्वेष पोटीने व सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत असले तरी जनता जनार्दन त्यांच्या मनोवृत्तीला ओळखून आहे त्यामुळे सरकार लवकरच गुन्हेगारीवर वचक लावण्यासाठी असामाजिक तत्त्व व व्याज खोरांचे बगलबच्चे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सज्ज असून दामनी पथक सुद्धा उभारणीचा आदेश पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या असून कॅमेऱ्याची कमांडो यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सुद्धा विशेष कक्ष उभारणी करून असा सामाजिक तत्त्वावर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम उभारण्याची सुद्धा निर्देश पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. तसेच आमदार सावरकर यांनी यासंदर्भात कोचिंग क्लास सेंटर मधील संचालकांना सुद्धा विनंती केली आहे की त्यांनी सी सी टी कॅमेराबसून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच सध्या परीक्षेचे वेळ लक्षात घेता परीक्षा बारावी दहावीची परीक्षा तुला कमी दिवस असताना विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणी करू नये मताच्या राजकारणासाठी अनेक प्लॅटफॉर्म असताना असा प्रकार करणे चुकीचा आहे. झालेली घटना कोणी समर्थन करणार नाही. त्यात यापासून भविष्यात यापासून शिकवण घेऊन याच्या संदर्भात उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भावना लक्षात घेऊन अहमदनगरच्या धरतीवर सक्षम यंत्रणा उभारण्या करण्याचे आदेश दिले आहे याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सावरकर यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार अभिनंदन व्यक्त केले. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी न घाबरता आपले शिक्षण चालू ठेवावे अडचण असल्यास आपल्या मोबाईलवर किंवा आपला जनसंपर्क कार्यालय किंवा भाजप कार्यालय येथे थेट संपर्क साधावा भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी अशा सामाजिक तत्त्वावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन कटिबद्ध असल्याचेही आमदार सावरकर यांनी सांगितले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या