Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात पंडित कृष्णाजी दुबे यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद्‌ भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभ 

अकोल्यात पंडित कृष्णाजी दुबे यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद्‌ भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभ 



अकोला - देवांच्या काळापासून भागवत कथा सर्वश्रेष्ठ ठरत आली आहे आणि आजही भागवत कथाच सर्वश्रेष्ठ आहे कारण भागवत कथा ऐकणाऱ्यांमध्ये जेवढा फायदा पुण्यवान भक्तांना होतो तेवढाच फायदा जो कुणी एकदाही मंदिरात गेला नाही देवाला नमस्कार केला नाही मात्र भागवत कथा ऐकली आणि त्याचा उद्धार झाला त्यामुळे भागवत कथेत एवढी शक्ती असल्याचे पंडित कृष्णाजी दुबे यांनी श्री राधेकृष्णा सेवा समिती, म्हैसपूर व साबळे परिवार किल्ला चौक अकोला यांच्या वतीने आयोजित भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभ करतांना पहिल्या दिवशी सांगितले 


अकोल्याचे आराध्य दैवत असलेले श्री राजराजेश्वर मंदिरामध्ये भागवत बालकथा (व्यास) वाचक पंडित कृष्णाजी दुबे यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद्‌ भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभ आज रविवार दि. ४ जून ला प्रारंभ झाला असून शनिवार दि. १० जुन २०२३ पर्यंत दुपारी ४ ते सायं. ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कथेकरिता मुख्य यजमान म्हणून विजय सुगंधचंद्र साबळे व सौ. वंदना विजय साबळे हे असून . या कथा श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री राधेकृष्णा सेवा समिती, म्हैसपूर व साबळे परिवार किल्ला चौक अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे. आज पंडित कृष्णाजी दुबे यांनी ओजस्वी वाणीतून कथा यज्ञ प्रारंभ झाला आहे. बाल कथाव्यास पं. श्री कृष्णाजी दुबे महाराज यांनी राधाकृष्ण सेवा समितीच्या वतीने 108 जोडप्यांच्या सामुहिक विवाह आणि त्यांना संसारोपयोगी साहित्यासाठी 2 लाख रुपये देण्या चा संकल्प केला असून हा सामुहिक विवाह सोहळा 2 मार्च 2024 ला आयोजित केला आहे याचसाठी आपल्या गावात शहरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञासाठी श्री राधेकृष्णा सेवा समिती, म्हैसपूर यांचे शी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या