Ticker

6/recent/ticker-posts

भुमीहिन शेतमजुर अतिक्रमणधारक जमीनीचे कायमस्वपी पट्टे करण्याची मागणी

भुमीहिन शेतमजुर अतिक्रमणधारक जमीनीचे कायमस्वपी पट्टे करण्याची मागणी


मौज सोनखास पो. पातुरनंदापूर ता. जि. अकोला येथील भुमीहिन शेतमजुर अतिक्रमणधारक सन १९८० पासून वहिती करीत असलेल्या जमिनीचे कायम पट्टे मिळणेसाठी अकोला जिल्हाधिकारी यांना भन्ते शिवली बुद्ध विहार चॅरिटेबल संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था तर्फे निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना. रामदासजी आठवले यांचे पत्र क्र. ३५६४ दि. १०/१०/२०२२ रोजी आपले कार्यालयामध्ये सादर करण्यात आले असून, सदर अतिक्रमणधारक हे भुमीहिन शेतमजूर १९८० पासून अतिक्रमण जमीन वहिती करून त्यामध्ये पिके घेत आहेत. शासन निर्णय १४ एप्रिल १९९० चे अतिक्रमण नियमकूल होण्यास पात्र आहे.  सन १९८७, १९८८, १९८९ पासून शासनाने केलेल्या कार्यवाहीसाठी तहसिल कार्यालय अकोला येथे दंडाचा भरणा सुध्दा केलेला आहे. तरी मंत्री महोदयाच्या पत्राचे अवलोकन करून, त्यांचे नावे जमीनीचे कायमस्वपी पट्टे करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी संस्थेचे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे त्र्यंबक भाऊ शिरसाट, जे पी सावंग, बुद्धभूषण गोपनारायण, बाळासाहेब दामोदर, अमोल गवई, अभिमान ओइंबे आदी उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या